भाजप सर्व निवडणुकात गंभीरपणे लढते, असे भाजपचे सर्व नेते वारंवार सांगतात. त्यानुसार भाजपने आता दीड वर्षावर असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. ८) या प्रमुखांची यादी जाहीर केली.ही निवड करताना भाजपने ज्या त्या विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विचार केला आहे. या प्रमुखांवर संबंधित विधानसभेतील उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे. त्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर योग्य ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. या प्रमुखांचे प्रदेशाध्यक्षBAWANKULE यांनी स्वागत केले आहे.
बावनकुळे यांनी निवडलेले प्रमुख युतीला विजय करून देतील असा विश्वास ट्विटद्वारे व्यक्त केला आहे. ते म्हणाले, MAHARASHTRA सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख व त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्यावर विश्वास आहे. त्यांच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला विजय मिळवून देतील.”दरम्यान, २०१९ च्या विधानसभेत तत्कालीन युतीतील भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला होता. मात्र सत्तास्थापनेवेळी युतीत वितुष्ट निर्माण झाले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडून शिवसेना (शिंदे गट) भाजपला मिळाला. त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. आता शिवसेना (शिंदे गट) आणि युतीत लढवणार आहेत.
सध्या वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा पेच सोडवण्यावर MVA भर देत आहे. युतीतही त्याबाबत खल सुरू आहे. दुसरीकडे मात्र भाजपने विधानसभेचीही तयारी सुरू केली आहे. विधानसभा मतदारसंघांच्या प्रमुखांची निवड करून भाजपने BJP महाविकास आघाडीला टक्कर देण्याची तयारी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही?