• Thu. May 1st, 2025

पाय धुण्यासाठी जाणे जीवावर बेतलं, भिंत कोसळून 3 महिलांचा मृत्यू

Byjantaadmin

Jun 6, 2023

विरार, 06 जून : मुंबई जवळील विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. भिंतीच्या ढिगाराखाली अजूनही 4 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये 3 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

(विरारमधील घटना)(विरारमधील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वच्या मनवेलपाडा रोडवर ही घटना घडली आहे. या परिसरात सूर्य किरण या बिल्डिंगचे रीडेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. आज दुपारी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून चार कामगार धिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे.

आज दुपारच्या सुमारास हे कामगार काम संपल्याने घराकडे निघत होते. मात्र काम संपल्यानंतर साचलेल्या पाण्यातच हात पाय धुताना पायासाठी गेले असताना बांधलेली भिंत या कामगारांच्या अंगावर कोसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर बचावकार्य सुरु झाले आहे. अग्निशमन पथकाच्या जवनांमार्फत त्यांना या कामगारांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच तीन महिला कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत जखमी असलेल्या एका मजुरावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *