शरद पवारांच्या निर्णयावरुन निलंगा येथे मौन धरण
निलंगा:-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. राज्यभर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नाराजी व्यक्त केली आहे.
पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी करीत आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते मात्र भावूक झाले आहेत. तसंच हा निर्णय तत्काळ मागे घ्या, अशीही विनंती ते करताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. निलंगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ
यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल येथे मौन धरणे करण्यात आले .यावेळी सर्वच मान्यवरांनी पक्षाचे संस्थापक शरद पवारांच्या निर्णयाने देशाला धक्का बसला आहे, अशी खंत व्यक्त केली
शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा मागे घेऊन आजीवन अध्यक्षपदी राहावे, व पक्ष घटनेत दुरुस्ती करून राष्ट्रीय कार्याध्यक्ष पद निर्माण करावा अशी मागणी केली आहे .
शरद पवारांमुळेच नेते आणि कार्यकर्ते घडले आहेत. देशाच्या विविध क्षेत्राची प्रगती झाली आहे. लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिले आहे. राजकारणातील सर्वच पक्षांचे ते आदर्श आहेत. त्यांच्या नेतृत्वाचे छत्र नसल्यास राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निरुत्साही होईल, त्यामुळे पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी असे साकडे घातले.
या मौन धारण मध्ये पंडितराव धुमाळ,लक्ष्मण कांबळे, सुधीर मसलगे, इस्माईल लदाफ हसन चाऊस,,धम्मानंद काळे, अंगद जाधव,महादेवीताई पाटील, पानफुलाताई पाटील, मुश्ताक बागवान,नजीर शेख, मुन्नाबी मोमीन, निलेश गायकवाड, नेताजी कांबळे, राजेश माने,सुग्रीव सूर्यवंशी, खुशाबा कांबळे, जहांगीर शेख,विश्वनाथ साळुंके, शंकर बनसोडे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.