स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ तर कॉंग्रेस त्यांच्या विरोधात संधी मिळेल तेथे आणि वाट्टेल तशी वक्तव्य करत सुटले आहेत. कॉंग्रेसमधून सावरकर विरोध करण्यासाठी आता माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार सरसावल्या आहेत. (Politics is well on fire because of Swatantra Veer Savarkar)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात आज शिवानी वडेट्टीवार यांनी मोर्चा उघडला. सावरकरांच्या विरोधात तोफ डागत त्या म्हणाल्या, ‘फुले, शाहू, आंबेडकरांसाठी कधीच मोर्चे काढत नाहीत. कुठला मोर्चा काढतात..? तर सावरकर मोर्चा काढतात आणि सावरकर मोर्चा काढून काय करतात? माझ्यासह इतर महिला भगिनी येथे उपस्थित आहेत.
सगळ्यांना भिती वाटत असेल कारण सावरकरांचे विचार काय होते, तर Rape is a Political Weapon and it should be use against your political opponent. म्हणजे काय? सावरकर म्हणायचे की, रेप हे पॉलिटिकल हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या पॉलिटिकल विरोधात वापरलं पाहिजे. तर माझ्यासारख्या महिला भगिनीला, येथे उपस्थित महिला भगिनींना कसं सेफ वाटणार आहे आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात.’
शिवाणी वडेट्टीवारांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून आधीच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता त्यात शिवानी वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी सावरकरांबद्दल केलेल्या सर्व विधानांबद्दल माफी मागावी आणि त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.
NANA PATOLE सडेतोड उत्तर देत, ‘राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) केसालाही धक्का लागला, तर याद राखा, असा दम नाना पटोलेंनी भरला. सावरकरांच्या मुद्द्यावरून आधीच BJP आण CONGRESS प्रदेशाध्यक्ष भिडले आहेत. हा वाद शमताना दिसत नाही. त्यातच आता शिवाणी वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात आज SHIVANI WADTEWAR यांनी मोर्चा उघडला. शिवानी म्हणाल्या, “फुले, शाहू, आंबेडकरांसाठी कधीच मोर्चे काढत नाहीत. कुठला मोर्चा काढतात..? तर सावरकर मोर्चा काढतात आणि सावरकर मोर्चा काढून काय करतात? सावरकरांचे विचार काय होते, तर बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. बलात्काराचे हे हत्यार विरोधकांच्या विरोधात वापरले पाहिजे. त्यामुळे अशा यात्रांमुळे माझ्यासारख्या महिला भगिनीला सुरक्षीत कसे वाटेल? अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात.”