• Fri. Aug 8th, 2025

उद्धव ठाकरेंचे आणि माझे शत्रुत्व बिलकूल नाही-देवेंद्र फडणवीस

Byjantaadmin

Feb 23, 2023

उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे आम्ही वैचारीक विरोधक आहोत पण शत्रू बिलकूल नाही. अलीकडे शत्रूत्व पाहायला मिळते ते संपवावे लागेल असे सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य ठाकरेंनी हेच वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

आमचे फक्त विचार भिन्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही.त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.

ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर वक्तव्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी माझ्या अनुभवातून शिकलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले होते का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा देतो.

सर्व हळुहळू समजेल

देवेंद्र फडवीस मी जे बोललो ते कसे खरे होते हे तुम्हाला समजत आहे. मी जे बोललो त्यात अर्धेच खरे समजले पुढे आणखी अर्धे कळते. मी काहीही बोललो की, समोरून दुसरी गोष्ट बाहेर येते. मी हळूहळू बोललो की, सर्व गोष्टी समोरून येतील.

मी हेच वारंवार सांगितले

देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, की, हे खरे आहे, मी पण हेच वारंवार सांगितले. आम्ही वैचारीक विरोधक आहोत. शत्रू बिलकूल नाही. महाराष्ट्रात एक कल्चर आहे मी असे म्हणेल की, या कल्चरमध्ये आपण वैचारीक विरोधक असतो.

आमचे फक्त विचार भिन्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.

लोकांना खरे वाटावे असे राऊतांनी बोलावे

संजय राऊत यांना माझी क्षमता अधिक आहे असे वाटते त्यांना माझ्या क्षमतांवर विश्वास वाटतो याबद्दल आभार मानुया. पण अलीकडे संजय राऊत जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्यासारख्या नेत्यांनी बोलताना वस्तूस्थिती पाहून, काही संयम पाळून बोलावे, लोकांना खरे वाटेल असे तरी बोलायला हवे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले, की ‘देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *