शेतकऱ्यांना काठ्याने मारहाण करणाऱ्या बेकायदेशीर सरकारला पळवून लावण्याची वेळ आली – शिवजीराव माने
लातुर:-शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अमानुषपणे पोलिसांनी शेतकरी आंदोलकांवर लाठी चार्ज केला अशा या सुलतानी पोलीस पोलीस प्रशासनाचा आणि शासनाचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख योगेश स्वामी,विष्णू साबदे, तालुका प्रमुख बाबुराव शेळके, महानगरप्रमुख विष्णुपंत साठे, विधानसभा प्रमुख एस.आर.चव्हाण, शहर प्रमुख सुनील बसपुरे, विधानसभा समन्वयक युवराज वंजारे,युवासेना जिल्हा प्रमुख राहुल मातोळकर,एड नारायण कवेकर, प्रा.सोमनाथ स्वामी,तानाजी करपुरे, महिला आघाडी सुनीता मामी चाळक, प्रिती ताई कोळी, सविता ताई निकम,अल्का ताई मुंगळे, दिलीप भांडेकर,रघु बनसोडे, शंकर गंगणे, गणेश गंगणे, निलेश शिंदे, गोविंद डावरे, सहदेव मोरे, महेश चांदणे,अजय घोणे,असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.