नवी दिल्ली, 23 डिसेंबर : भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 वीर जवांनाना आपला जीव गमवावा लागला आहे. हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होते. तसेच हा ट्रक सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे जाताना, वळण घेत असताना वाहन तीव्र उतारावरून घसरले. यानंतर हा भीषण अपघात झाला
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, एन. सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे “खूप दुःख” झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना; जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तो सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाला होता. झेमा येथे जाताना, तीक्ष्ण वळण घेत असताना वाहन तीव्र उतारावरून घसरला आणि हा भीषण अपघात झाला. बचाव मोहीम तात्काळ सुरू करण्यात आली असून चार जखमी सैनिकांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. दुर्दैवाने, तीन कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि 13 सैनिक या अपघातात जखमी होऊन मरण पावले. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे, असे सैन्यदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.