गाव आहे मांजरा नदीच्या कुशीत,; मात्र प्यायला पाणी मिळते दूषित…
लाडक्या बहिणीचा निलंगा पंचायत समितीवार घागर मोर्चा
निलंगा /प्रतिनिधी :-निलंगा तालुक्यातील माजरटवाडी या गावात मागच्या 15 वर्षापासून माचरटवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा कुठलाही सोर्स नाही व माचरटवाडी – ढाबळेवाडी ग्रुप ग्राम पंचायत असल्यामुळे मुलभुत सुविधाकडे लक्ष दिले जात नाही. तसेच गावात एक हातपंप असून त्या हातपंपाच्या भोवताली गटारीचे पाणी जात असून त्यामुळे आरोग्य विभागाने पाणी पिण्यास अयोग्य आहे असे सांगीतले आहे. तसेच माचरटवाडी येथील ग्रामस्थ हे शेतातील शेतकऱ्यांना विनंती करून त्यांचे विकत पाणी हे मागंच्या 15 वर्षापासून आणून आपली व आपल्या कुटूंबाची तहाण भागवित आहेत. तसेच मागच्या दोन महिन्यापासून गावात सांडपाणी हे पण मिळत नाही तसेच माचरटवाडी हे गाव कागदोपत्री 100% हागानदारी मुक्त असून लाडक्या बहिणीला पाण्याभावी उघड्यावर स्वच्यास जावे लागत आहे.म्हणुन वारंवार ग्राम पंचायत स्थरावर माहीती देऊन पण जाणुन बुजून हे ग्राम पंचायतचे लोक दुर्लक्ष करीत आहेत.मूलभूत सुविधेच्या नावाखाली प्रचंड निधी लाटूनही गावात एकही नाली झाली नाही. म्हणुन आज माचरटवाडी येथील महिला निलंगा गटविकास अधिकारी कार्यालयात घागर मोर्चा काढण्यात आला. जर वेळेत या आंदोलनाची दखल शासन, प्रशासन यांनी नाही घेतली तर येणाऱ्या काळात सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने सत्ताधारी यांच्या अभय असलेलेल्या कर्मचाऱ्याला तोंडाला काळे फासून पंचायत समितीच्या आवारातच धिंड काढन्याय येईल असा इशारा लाडक्या बहिणींनी दिला.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे, अशोक चव्हाण, लिंबाराज शिंदे, शालू लांबुटे,मंगल टमके, अनुराधा लांबोटे, अंजरबाई शिंदे, लक्ष्मी लांबोटे, सविता लांबोटे, अस्विनी लांबोटे, श्यामा मोरखंडे,सुमन गोलकुंडे, पारवतबाई चव्हाण,पद्मिनबाई कवाडगावे, मनीष्या लांबोटे.यासह असंख्य ग्रामस्थ उपस्तित होते.

