• Tue. Jun 17th, 2025

महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रा. से.यो.शिबिराचे उद्घाटन संपन्न 

Byjantaadmin

Jan 29, 2025

महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रा. से.यो.शिबिराचे उद्घाटन संपन्न 

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मौजे. लिंबाळा येथे दिनांक २३ ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित केले असून या शिबिराच्या उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला.

       शिबिराचे उद्घाटन तहसील कार्यालय, निलंगा येथील तहसीलदार मा.श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तर या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांची उपस्थिती होती.

     आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, एन.एस.एस. चे शिबिर हे विद्यार्थी जीवनातील एक मोठी पर्वणी असते. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार व नेतृत्व गुण विकसीत करण्याची संधी उपलब्ध होते. या सात दिवशीय शिबिरात विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. 

   या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून सात दिवशीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. 

        उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमअधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी सात दिवसीय शिबिरातील कार्यक्रमांची रुपरेषा व गावात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर लिंबाळा ग्रामपंचायतचे सरपंच श्री. सखाराम कलबोने यांनी ग्रामस्थांच्या वतीने शिबिर आयोजनाची भुमिका व सर्वतोपरी सहकार्य करण्याची  भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

 उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. माधव कोलपुके म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाचे असुन श्रमसंस्कारासह चारित्र्य संवर्धन आणि विधायक दृष्टिकोन निर्माण करणे, खेड्यांमधील जीवनपद्धती समजावून घेऊन सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी हा शिबिराचा उद्देश असतो. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी या सात दिवशीय शिबिराच्या माध्यमातून आपल्यात विधायक परिवर्तन घडवून आणावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

 आभार प्रदर्शन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले. याप्रसंगी ग्रामसेवक श्री.व्हि. एन. मुक्तापुरे,  उपसरपंच श्री. बालाजी माने, श्री. निवृत्ती माने कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण दिवे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा जाधव गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *