ज्यात लोकसभा निवडणुकीचीलगबग जोरात सुरु आहे. धाराशिवच्या जागेवरून महायुतीची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबते सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर सुटल्याचे स्पष्ट झाले आहे.महायुतीमध्येधाराशिव, नाशिक हे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. या जागेवर असलेला तिढा रविवारी रात्री झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धाराशिव, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार फायनल करण्यात आले आहेत.धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव जवळपास फायनल झाले आहे. तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण उपस्थित होते. सोमवारी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन धाराशिव उमेदवाराची घोषणा करणार आहेत.दवाराची घोषणा करणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
