• Wed. Apr 30th, 2025

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये चर्चा, तीन दिवसांत निर्णय

Byjantaadmin

Feb 24, 2024

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांचे जागावाटप अंतिम करण्यापूर्वी शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.

महाविकास आघाडीतील काही जागावाटपावर एकमत होत नसल्याने या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे कळते.राहुल गांधी यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेतून आठ जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल, अशी चर्चा आहे. येत्या २७ आणि २८ तारखेला लोकसभा जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत कशाप्रकारे सामावून घ्यायचे, याबाबतही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याच चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed