मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गुंडांवरून विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंड प्रवृतीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होत असून त्यांचे गुंडांना समर्थन असल्याचा दावाही विरोधक करत आहेत. यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहेत. अशातच संजय राऊत यांनी फोटो ट्विट करून आरोपाचा मोठा बार उडवून दिला आहे.ठाकरे गटाचे खासदार (Sanjay Raut) यांनी जामिनावर सुटलेला गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) आणि (Eknath Shinde) यांचा एकत्र फोटो ट्वीट केला आहे. त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार यांनीही त्या गुंडाचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्या गुंडाने मंत्रालयात रिल शूट केल्याचे दाखवले आहे. यावरून आता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत.भाजप आमदार (Ganpat Gaikwad) यांना भर पोलिस ठाण्यात गोळीबार केला. त्यातून त्यांची राजकीय मस्ती दिसल्याचा आरोप होत असतानाच आता मुख्यमंत्री एका गुंडाला भेटतात आणि त्याच्यासोबत फोटो काढतात, यावरून ते आरोपांच्या कैचीत सापडले आहेत.मंत्रालयात एक गुंड येतो आणि रिल शूट करतो. आणि या मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी मनस्ताप सहन करावा लागतो, आणि तासनतास रांगेत उभे राहावे लागते. यावरून विरोधकांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.पुण्याचा गुंड नीलेश घायवळ याने मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयात फोटो काढलेला आहे. यावरून संजय राऊत यांनी थेट टीकेची तलवार उपसली आहे.
‘महाराष्ट्रात गुंडा राज:
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने…’
या शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे, भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा आसूड ओढला आहे.
कोण आहे नीलेश घायवळ?
नीलेश घायवळ यांच्या विरोधात पुण्यात अनेक (Crime) दाखल आहेत. नीलेश घायवळच्या संपूर्ण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती. येरवडा कारागृहातूनच पुणे पोलिसांनी नीलेश घायवळवर अटकेची कारवाई केली होती. तेव्हापासून हे नाव चर्चेत होते.
सर्वसामान्य जनतेला त्रास
राज्यातून रोज हजारो लोक मंत्रालयात येतात. त्यांना रांगेत तासनतास उभे राहावे लागते. अनेकदा गरजेची कागदपत्रे देऊनही प्रवेश नाकारला जातो. कुठल्या मंत्र्याकडे जायचे असून नेमके त्या कागदपत्रात मुख्य मजकूर काय आहे हे देखील तपासले जाते. यावर विरोधी पक्षनेते (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज:
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2024
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे… pic.twitter.com/n1L3722t1c
“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी (Mantralaya) खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे.
श्रीकांत शिंदेंना गुंडाकडून शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र (Shrikant Shinde) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यातील एका गुंडाने ‘वर्षा’ निवासस्थानी उपस्थिती लावली होती.

पुणे शहरातील गुंड श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देताना फोटोत दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनीसुद्धा हा फोटो टि्वट केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील हा गुंड कोण? याची विचारणा राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली.हा कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणाऱ्या शिवसेनेचा युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर… pic.twitter.com/vjih1SkiFW
पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती “मोदी की गॅरंटी” ?, असं ट्विट करत वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.