• Wed. Jun 18th, 2025

लातूरच्या त्या कर्मचाऱ्याचं करावं तेवढं कौतूक कमीच…

Byjantaadmin

Oct 24, 2023

लातूर : तुम्ही अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील की बँकेच्या किंवा कुणाच्या चुकीमुळे व्यवहारामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले आहेत. अशा परिस्थितीत बरेच लोक गप्प बसतात आणि ते पैसे खर्च करतात. अनेक लोक त्याचा लाभ घेतात आणि काही तासांत लाखोंची कमाई करतात. पण महाराष्ट्रातील लातूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या खात्यात चुकून रक्कम जमा झाल्याची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणेची सर्वत्र चर्चा होत आहे.

नेमकं काय झालं?

ही घटना महाराष्ट्रातील लातूरची आहे. इथं सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले श्रीकांत जंगन्नाथराव जोशी हे सध्या निवृत्त जीवन जगत आहेत. शहरातील गांधी चौकात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये त्यांनी मुदत ठेव खाते उघडले होते. त्यात काही रक्कम जमा करण्यात आली होती, जी पाच वर्षांत परिपक्व होईल. मॅच्युरिटीनंतर खात्यातून पैसे काढण्यासाठी ते गेले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या खात्यात एक लाखाहून अधिक रक्कम जमा झाली होती.यासंबंधी पीटीआय या वृत्तसंस्थेने टपाल खात्याच्या अधिकाऱ्याचा हवाला देत वृत्त दिले आहे की, जोशी यांनी जमा केलेली रक्कम मुदतपूर्तीवर १,६३,७७७ रुपये होती. मात्र एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्याच्या खात्यात २,६४,७७७ रुपये जमा झाले आहेत. जोशी यांनी तत्काळ त्यांच्या पोस्ट ऑफिस एजंटला याची माहिती दिली आणि अतिरिक्त १.०१ लाख रुपये परत केले. त्याच्या प्रामाणिकपणाची खूप चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *