• Mon. Jun 23rd, 2025

मराठ्यांचा आग्या मोहोळ शांत आहे, त्याला उठवू नका; जरांगे पाटलांचा सरकारला गर्भित इशारा !

Byjantaadmin

Oct 14, 2023

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे आज त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. या सभेला मराठा बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. या ऐतिहासिक सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी गर्दीकडे एक कटाक्ष टाकीत मराठ्यांचा आग्या मोहोळ हा सध्या शांत आहे. त्याला उठवू नका, असा गर्भित इशारा केंद्र आणि राज्य सरकारला दिला.नव्हेतर संयमाचा अंत पाहू नका, अशी चेतावणीच दिली आहे. मराठवाड्यासह राज्यातील मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या, यासह ५० टक्क्यांच्या आतील आरक्षणात समावेश करा, आदी मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे मागील काळात आमरण उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी सरकारला मराठा आरक्षण प्रक्रियेसाठी मुदत देत आंदोलन मागे घेतले होते.

शिस्तबद्ध सभा

या मुदतीत त्यांनी maharashtra दौरे करूनmaratha samaj  मोट बांधली. तत्पूर्वीच त्यांनी १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधवांचे लोंढेच्या लोंढे अंतरवालीत कालपासूनच दाखल झाले. शांततेत पार पडत असलेल्या या सभेत लाखो मराठा बांधव जरांगे पाटील काय भूमिका जाहीर करतात, याकडे लक्ष देऊन होते.सभेला जमलेली गर्दी पाहून जरांगे पाटीलही क्षणभट अंतर्मुख झाले. या वेळी बोलताना त्यांनी कोण म्हणतं की, मराठ्यांचे एकत्रीकरण होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला हा समाज आहे. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत मराठा बांधव सभास्थळी दाखल झाले. कुठलाही अनुचित प्रकार सभेला येताना आणि सभा सुरू असताना घडला नाही. ही बाब police  आपल्याला सांगितल्याचा उल्लेख करीत जरांगे पाटलांनी एक कटाक्ष गर्दीवर टाकला.

पुढचे आंदोलन अधिक तीव्र

त्यानंतर मराठ्यांचा आग्या मोहोळ सध्या शांत आहे. त्याला उठवू नका, असे म्हणताच गर्दीतून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या कडकडाटातच जरांगे पाटलांनी केंद्र व राज्य सरकारला गर्भित इशारा दिला. आग्या मोहोळ ही मधमाश्यांची प्रजात अतिशय शांत असते. मात्र, कुणी या माश्यांच्या वाट्याला गेल्यास ती अतिशय हिंस्र होते. हिंस्र आग्या माश्यांनी आजवर अनेकांचे बळी घेतले.इशारा नव्हेतर चेतावणीच आग्या मोहोळची मराठ्यांना उपमा देत जरांगे पाटलांनी केंद्र व राज्य सरकारला दिल्याचे अनेकांना जाणवले. आगामी दहा दिवसांनंतर जरांगे पाटील हे पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. पुढचे आंदोलन हे यापेक्षा तीव्र राहील, असे सूतोवाच जरांगे पाटलांना आज केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *