• Thu. Jun 19th, 2025

”वरुन आदेश आल्याचं सिद्ध करुन दाखवा…” अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Byjantaadmin

Sep 4, 2023

मुंबईः मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उपसमितीची एक बैठक आज संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.सुरुवातीला बोलताना देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची माफी मागून लाठीहल्ल्याची घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. त्यानंतर अजित पवारांनी राज्यभरातील मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलं.अजित पवार बोलताना म्हणाले की, उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी उदयनराजे, गिरीश महाजन गेले होते. त्यासंबंधीचा तोडगा निघणार आहे.अजित पवार पुढे म्हणाले की, पोलिसांनी मराठा आंदोलकांवर जो लाठीहल्ला केला त्यासंदर्भात राजकारण केलं जात आहे. वरुन आदेश आले, असं काहीजण बोलत आहेत. विरोधकांनी वरुन आदेश आल्याचं सिद्ध केलं तर आम्ही त्यांचं सगळं ऐकून घेऊ. आता शांततेची आणि आंदोलन थांबण्याची गरज आहे.

पोलिसांना गृहमंत्रालयाकडून आदेश आलेले असू शकतात, असा पहिला आरोप शरद पवारांनी केला होता. त्यानंतर विरोधी पक्षातल्या अनेकांनी सरकारने लाठीहल्ल्याचे आदेश दिल्याचं म्हटलं. त्यावरुन अजित पवारांनी थेट उत्तर दिलं. त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.फडणवीस पुढे म्हणाले की, दोन दिवस मी आजारी होतो म्हणून बाहेर पडू शकलो नाही. जालन्यात जे झाले ते व्हायला नको होतं आरक्षणा ही सगळ्यांचीच मागणी आहे. काही लोक या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजत आहेत. अनेक समाज आरक्षणाची मगणी करतात पण ते कायद्याच्या कसोटीत बसायला हवा.”देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल आरक्षणा  उच्च न्यायालयात टिकलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. कोणत्या कारणाने ते टिकलं नाही याचा अभ्यास गरजेचा आहे. आजच्या बैठकीमध्ये त्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे”अजित पवार यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलायला सुरुवात केली. मराठा समाजासाठी राज्य सरकराने काय काय पावलं उचलली, हे त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *