• Mon. Aug 18th, 2025

लातूर:इंजिनमधून धुराचे लोट, चालकाच्या काळजाचं पाणी पाणी, प्रवाशांची धावपळ, त्या एसटीत काय घडलं?

Byjantaadmin

Aug 18, 2023

लातूर: कल्याण – लातूर या चालत्या प्रवासी बस अचानक पेट घेते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊन बसच्या इंजिनमधून अचानक मोठा धुराचा लोट निघाल्याचे पाहून बस चालकाच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, चालकाने प्रसंगावधानता राखत तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला घेतली. प्रवाशांना तत्काळ बसमधून उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला अन् तब्बल ५० प्रवाशांचे जीव वाचला. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली कल्याण आगाराची एम. एच. १४ बी. टी. २३३२ या क्रमांकाची बस कल्याणवरून लातूरला निघाली होती. सलग नऊ तास प्रवास करत ही बस उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी या गावी पोहचली. तेव्हा या बसमधे ५० प्रवासी होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांचा समावेश होता. चालकाच्या जीवावर अन् परिवहन महामंडळाच्या भरवशावर हे प्रवासी या बसने प्रवास निर्धास्त प्रवास करीत होते. अनेकांना बसमधे डुलकी लागली होती, तर अनेकजण गप्पांमधे रंगले होते. काहीजण खिडकीतून बाहेरचा हिरवागार नयनरम्य निसर्ग न्याहळत होते. अचानक बस रस्त्याच्या बाजूला करत बस चालक नरूटे यांनी अचानक ब्रेक लावला अन् लवकर गाडीच्या खाली उतरा असा प्रवाशांना जोरात आवाज दिला. सर्वांची तंद्री तुटली अन् बसमधे एकच गोंधळ सुरू झाला. नेमक काय झालं कोणाला काहीच कळेना. प्रवासी गोंधळून बसच्या खाली उतरू लागले. आपत्कालीन खिडकीही उघडण्यात आली. कोण दरवाजावाटे तर कोण आपत्कालीन खिडकीतून खाली उतरले. बसपासून थोड्या अंतरावर सर्व प्रावासी सुखरूप थांबले.

Latur ST bus fire

दरम्यान ग्रामस्थही जमा झाले. त्यांनी तात्काळ पाणी आणून बसच्या धुर निघत होता त्या ठिकाणी टाकले. धूर निघायचा थांबला. प्रवाशांनी आपापल्या पिशव्या ताब्यात घेतल्या. बस चालक नरुटे यांचे आभार मानले. वाहक चालक यांनी सर्व प्रवाशांना लतूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या दुसऱ्या बसमधे बसवून पाठवले. बस चालक नारुटे यांच्या प्रसंगावधानतेमुळे तब्बल ५० प्रवासी सुखरूप लातुरला मार्गस्थ झाले.

लाल परीचा प्रवास रामभरोसेच

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत प्रवाश्यांना विवीध सवलती दिल्या आहेत. तसेच महामंडळाच्या ताफ्यात अनेक नवीन बस दाखल झाल्या आहेत. या नव्या तसेच जुन्या बसची तांत्रिक तपासणी करूनच रस्त्यावरून धावण्यासाठी सोडल्या जात असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता. या बस वर गतिमान सरकारच्या जाहिराती दिसत आहेत. मात्र, बसची दुरावस्था पाहता प्रवासी रामभरोसे प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. आज ढोकी येथे घडलेला प्रसंग असो. प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे का आसा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *