• Sat. Aug 16th, 2025

सोयाबीनला जास्त भाव देतो; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला, ५० लाखांना चुना

Byjantaadmin

Aug 15, 2023

उस्मानाबाद : तुमच्या सोयाबीनला आडत पेक्षा २०० ते ३०० रुपये अधिक भाव देतो असे सांगुन ३३ शेतकऱ्यांना ५० लाखांना चुना लावल्याची घटना घडली आहे. सुरुवातीस १० शेतकऱ्यांकडून सोयाबिन घेतले त्यांना वाढीव भावसुध्दा दिला. मात्र, शेतकऱ्यांचा विश्वास वाढल्यानंतर ३३ शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे दिलेच नाहीत.याबाबत अधिक माहिती अशी की, (नानासाहेब भानुदास भोसले रा. बॅक कॉलनी, उस्मानाबाद धंदा नोकरी सहाय्यक पोलीस फौजदार /३९) याने हल्ली नागरी हक्क संरक्षण विभाग उस्मानाबाद कर्तव्यावर असताना नानासाहेब भोसले यांनी दि.१६ जानेवारी २०२२ ते २४ एप्रिल २०२२ रोजी वेळीवेळी रुईभर आणि बरमगाव येथे एकुण ३३ शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा ५२० क्विंटल ७६ किलो, सोयाबीन २६३ क्विंटल ५७ किलो असा एकुण ७८४ क्विंटल ३३ किलो किंमत अंदाजे पन्नास लाख पस्तीस हजार रुपये एवढ्या किमतीचा सोयाबिन आडत दुकानांपेक्षा जास्त भाव देतो असे सांगून वेळोवेळी विकत घेवून त्याचे पैसे ठरलेल्या मुदतीत दिले नाहित

Osmanabad Assistant Police Officer Cheats Farmers

.तसेच आपल्या बँक खात्यावर रक्कम नसल्याचे माहित असताना देखील सदर रकमेचा चेक शेतकऱ्यांना दिला मात्र, रक्कम नसल्याले तो चेक वटलाच नाही अशी तक्रार नागनाथ बाबुराव वडवले (वय ४२ वर्षे रा. रुईभर ता. जि. उस्मानाबाद) यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे पैसे न देता व बॅकेत न वटनारा चेक देवून फसवणुक केली अशा मजकुराच्या नागनाथ बाबुराव वडवले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहिता कलम ४१७,४२० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश शिंदे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *