मुंबई : राज्यात महावीकस आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अखेर होण्याची चिन्हे आहेत. या आमदारांच्या नियुक्त्यांचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात या जागांचे वाटप होणार आहे अशी माहिती आहे.राज्यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरून मोठा गदारोळ झाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महावीकस आघाडीसरकारने मोठी टीका केली होती. शरद पवार , उद्धव ठाकरे, तसेच कॉँग्रेसच्या नेत्यांनी कोश्यारी यांचावर मोठी दिला केली होती. असे असेल तरी कोश्यारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. या संदर्भात महावीकस आघाडी सरकार थेट न्यायालयात गेले होते. यावर न्यायालयाने स्थगीती दिली होती. दरम्यान, ही स्थगिती उठवली असल्यामुळे आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झळ आहे.
अधिवेशन झाल्यावर या नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती आहे. सरकार मध्ये भाजप, शिवसेना राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आल्याने त्यांच्यात या जागांचे वाटप केले जाणार आहे. भाजपला ६ राष्ट्रवादीला ३ आणि शिवसेनेला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. या बाबत अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असून हे सूत्र सर्वांना मान्य असल्याची माहिती आहे.विधानसभेच्या रिक्त जागांवर राज्यपाल यांच्या मार्फत आमदारांची नियुक्ती केली जाते. या बाबत मुख्यमंत्री त्यांना सल्ला देत असतात. कलम १६३ (१ ) अंतर्गत राज्यपाल या निवडी करू शकतात.