• Sat. Jun 21st, 2025

मणिपूर देशात आहे की, देशाबाहेर? विधानसभेत चर्चेला परवानगी नाकारली !

Byjantaadmin

Jul 21, 2023

मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचार काही केल्या कमी होत नाहीये. तेथे महिलांवर केल्या जात असलेल्या अनन्वित अत्याचारांनी समाजमन सुन्न झाले आहे. आज विधान परिषद सभागृहातही धगधगत्या मणिपूरचे पडसाद उमटले.कॉंग्रेसचे आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी आज मणिपूरच्या मुद्द्यावर सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. ते म्हणाले, मणिपूर हिंसाराचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, देशाचे गृहमंत्री अमित शाह बोलत नाहीत. मणिपूर देशात आहे की, देशाच्या बाहेर आहे, ते तरी कुणी एकदा स्पष्ट करावे. असे म्हणताच विरोधी सदस्य उठून उभे झाले आणि सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला.

विरोधी बाकावरील सदस्य गोंधळ घालत असताना सत्ताधाऱ्यांचाही आवाज वाढायला लागला. हे बघून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परिस्थिती हातात घेतली. त्या म्हणाल्या, यासंदर्भात मी स्वतः निवेदन दिलेले आहे. हातरज असेल किंवा निर्भया प्रकरण असेल… अगदी मणिपूरच्या प्रकरणातही मी निवेदन केले आहे. काही विषय हे राजकारणाच्या पलीकडले असतात. त्यामुळे तुम्ही या विषयाचे राजकारण करू नका, असे त्यांनी विरोधी सदस्यांना खडसावले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा काही विषय राजकारणाच्या पलीकडले असतात. त्यातलाच हा एक विषय आहे, अशी सूचना केली आहे. कठोर शिक्षा करून अशा घटना यापुढे होऊ नये. SUPRIME COURT दखल घेतली आहे. अशा गोष्टी टाळण्यासाठी राज्यांनीही कायदे कडक करण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

तुम्ही राजकीय भांडवल करत आहे. मी स्वतः संवेदनशीलतेने सांगते आहे, तरीही तुम्ही ऐकण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. त्यामुळे या प्रश्‍नावर तुम्हाला बोलू देणार नाही, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी कठोर भूमिका घेतली. त्यानंतर वातावरण शांत झाले.

निर्भयाच्या प्रकरणाच्या वेळी कायदा बदलण्यात आला. कुर्ल्याची घटना घडली, त्यावेळी UDHAV THAKRE मुख्यमंत्री होते. तेव्हा शक्ती कायदा तयार करण्यात आला. आताही आपण चर्चा करायला तयार आहोत, अशी भूमिका मांडल्यावरही तुम्ही गोंधळ घालत असाल, तर ते योग्य नाही. १४० कोटी भारतीयांसाठी ही बाब लज्जास्पद असल्याचेही NEELAM GORHE म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *