माता पिता व गुरुजनांचा संस्काराचा अनमोल ठेवा विसरू नका -तहसीलदार उषाकिरण शृंगारे
निलंगा – विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये माता पिता व गुरुजणांच्या संस्काराचे मोल अनन्यसाधारण आहे. या संस्काररूपी शिदोरीच्या बळावरच आज गुणवंत म्हणून नावलौकिक केला आहे. त्यामुळे माता-पिता व गुरूच्या संस्काराचा हा अनमोल ठेवा आयुष्यात कदापी विसरू नका, असा मौलिक सल्ला तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी गुणवंत विध्यार्थ्यांना दिला.
मराठा सेवा संघाच्या वतीने येथील जिजाऊ सृष्टी सभागृहात आयोजित कार्यक्रमात निलंगा तालुक्यातील 10 वी 12 वी तसेच नूतन PSI, MBBS ला लागलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार उषाकिरण शृंगारे बोलत होते. उपमुख्यकार्यकारी अधिकारी गिरी डी. बी. उद्घाटक म्हणून उपस्थित होते,गटविकास अधिकारी अकेले सोपानराव, गटशिक्षणाधिकारी गायकवाड एस बी, पोलीस निरीक्षक गोविंद राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख, प्रा. संभाजी नवघरे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव जाधव एम एम,जिल्हा संघटक विनोद सोनवणे, सतिष हानेगावे, डी. बी. बरमदे,ज्ञानेश्वर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
विध्यार्थ्यांनी आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले तरी आई वडिलांची सेवा करावी तरचं या यशाला महत्व आहे असे मत उपमुख्यकार्यकारी अधिकारी गिरी डी. बी यांनी व्यक्त केले, जीवनात अनेक आव्हाने आहेत, त्यावर मात केली पाहिजे. विचारांची दिशा पक्की असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते, असा यशाचा मंत्र देऊन ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे यांनी केले सूत्रसंचालन उत्तम शेळके, आभार जिल्हा सचिव जाधव एम एम यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेलवाडे आर के, इंजि. मोहन घोरपडे, डॉ. उद्धव जाधव, डॉ. सचिन बसुदे,डॉ. नितीश लंबे,डी. बी. गुंडुरे,अनिल जाधव, कुमोद लोभे,गुणवंत गायकवाड, दत्तात्रय बाबळसुरे, बाळासाहेब बिराजदार, अर्चना जाधव, रंजना जाधव, बालाजी बरमदे, डी. एन. बरमदे,प्रमोद कदम, सुबोध गाडीवान, आनंद जाधव,राजन सोळुंके,पिंटू सगरे,महेश जाधव, अजित लोभे,बंटी देशमुख आदींनी परिश्रम घेतले.