मुंबई परिसरात सध्या पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जागो जागी पाणी साचलं आहे. मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरलं आहे. महागड्या गाड्या पालापाचोळ्याप्रमाणे वाहून जात आहेत. अशा स्थितीत आजवर आपण अनेकदा म्हणायचो की एक वेळ येणार जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर गाड्यांऐवजी बोटी चालवाव्या लागतील. अन् काय सांगता ती वेळ खरोखरच आली आहे. विरारमधील लोक चक्क बोटीत बसून प्रवास करताना दिसतायेत. विश्वास बसत नाहिये ना? तर मग हा व्हिडीओ पाहा, रस्त्यांवर गाड्यांऐवजी चक्क बोटी फिरतायेत.
हा व्हिडीओ होतोय व्हायरल
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार २० जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याही या सर्व ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज सकाळपासून या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. रायगड जिल्हयातील महाड शहरात, तर रत्नागिरीच्या खेडमध्ये नदीचे पाणी शहरात शिरले आहेत. आज रात्रीपर्यंत याठिकाणी पावसाचा जोर कसा राहतो, यावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण आणि रायगडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.