युवासेनेच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना ज्वारी नुकसानीचे शासनाकडून लाखो रुपये अनुदान प्राप्त
निलंगा- निलंगा तालुक्यातील मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व ज्वारीचे अतोनात नुकसान झालेले होते, त्या नुकसानीचे पंचनामे झाल्यामुळे आज नणंद ग्रामस्थांना शासनाकडून लाखो रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.
रब्बी हंगामात 18 मार्च 2023 रोजी पहाटे चार ते सहा दरम्यान निलंगा तालुक्यातील अनेक गावामध्ये अतिवृष्टी झाली होती. या दिवशी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे गहू व ज्वारी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे तात्काळ गहू व ज्वारी पिकाचे पंचनामे करावेत अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यावर 19 मार्च रोजी निलंग्याचे तहसीलदार अनुपजी पाटील यांनी नणंद गावात येऊन गहू व ज्वारी पिकाचे नुकसान प्रत्यक्षात पाहून तलाठ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, त्यावर तलाठ्यांनी गावातील गहू व ज्वारीचे नुकसान झालेल्या 374 शेतकऱ्यांचे पंचनामे करून तसा अहवाल प्रशासनास कळवला होता. त्यावर शासनाने हेक्टरी 8500 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून शासनास सततचा पाठपुरावा केल्यामुळेच आज नणंद येथील 374 शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाले याबद्दल नणंद येथील शेतकऱ्यांच्या वतीने युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.