• Wed. Jun 25th, 2025

भारत जोडो नंतर काँग्रेसची बस यात्रा, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातून सुरूवात, लोकसभेच्या 20 जागा जिंकण्याचं टार्गेट

Byjantaadmin

Jul 11, 2023

नवी दिल्ली: राज्यातल्या नेत्यांनी आपापसातले मतभेद विसरावं आणि कामाला लागावं, येत्या लोकसभेसाठी राज्यातून किमान 20 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवावं असा आदेश काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये येत्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात यात्रा काढावी आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात बस यात्रा सुरू करावी असाही ठराव करण्यात आला.काँग्रेसचे आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं. राज्यातील अनपेक्षितपणे घडणाऱ्या राजकीय घडामोडी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका आणि काँग्रेसची सध्याची स्थिती यावर चर्चा करण्यात आली.

congress meeting delhi bus yatra to start from maharashtra november December Congess Meeting : भारत जोडो नंतर काँग्रेसची बस यात्रा, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातून सुरूवात, लोकसभेच्या 20 जागा जिंकण्याचं टार्गेट

आपापसातले वाद मिटवा… कामाला लागा

नेत्यांनी आपापसातले वाद मिटवून कामाला लागावं असा सल्ला काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या घडामोडींचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका असाही सल्ला देण्यात आला आहे. लोकसभेसाठी किमान 20 जागांचं टार्गेट काँग्रेस कमांडकडून महाराष्ट्र प्रदेश समितीला देण्यात आलं आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सतेज पाटील, अशोक चव्हाण, वर्षा गायकडवाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी

काँग्रेस मुख्यालयात झालेल्या आजच्या बैठकीत सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीनंतर हाय कमांडशी वैयक्तिक संवाद साधण्याची काही नेत्यांची इच्छा होती पण तो संवाद होऊ शकला नाही काँग्रेसने महाराष्ट्रापासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकाने गट तट विसरून काँग्रेस पक्षाला मजबूत केले पाहिजे. भारत जोडो यात्रेचा अनुभव देशात सर्वात चांगला maharshtra मध्ये आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. सर्व ज्येष्ठ नेत्यांना ठराविक लोकसभा मतदारसंघांचे जबाबदारी वाटून दिली जाणार असल्याची माहिती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *