शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले -शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने
औसा;- शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली औसा तालुक्यातील 105 गावांमध्ये नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आलेले आहे लोहटा तालुका औसा येथे सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले की शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण सा औसाचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये नेत्ररोग व सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत आज लोहटा या गावांमध्ये सदरील शिबिराचे उद्घाटन झालेले असून जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा शिवसेना नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकणारी संघटना आहे एकमेव शिवसेना पक्ष असा आहे की नेहमीच दिन दुबळ्या दलित शेतकरी कष्टकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नावर भांडून संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत असते प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून अधिकाऱ्याला चढलेला माज उतरावून जनतेला न्याय मिळवून देत असते या महाराष्ट्रामध्ये नाही संबंध देशांमध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे टाकणारा नेता जर कोणता असेल तर ते नाव सन्मानाने घेतलं जातं असे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल रोगराईचा संकट असेल शासनाचे उदासीन धोरण असेल या सगळ्या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं टाकून शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नी महाराष्ट्रात केलेलं आहे काही लोक फक्त हवेत गप्पा मारतात आम्ही शेतकरी आहोत आमच्या शेतकरी अशी खूप जुळवून देणंघेणं आहे परंतु सत्तेत बसल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर जर कोणाचं कंबरड मोडलं जातं तर ते शेतकऱ्याचे मोडलं गेलंय परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि शेतकऱ्यावरच्या डोक्यावरचा कर्जाचे ओझ कमी केले दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ केले कसलाही गाजावाजा नाही बॅनर नाही पोस्टर नाही सत्कार नाही हे फक्त आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबच करू शकतात आणि करून दाखवलेला आहे म्हणून महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातला शेतकरी तमाम कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार व्यापारी सगळेच जण आज उद्धव साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान मला वाटतो औसा तालुका नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन चालणारा तालुका आहे या तालुक्यातील जनता नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेली जनता आहे आणि निश्चितच भविष्यकाळात औसा तालुक्यातील जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे च्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील हा आत्मविश्वास मला आहे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दिलेल्या शिबिराचे नियोजन शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांनी खरोखरच मला अपेक्षित असलेलं नियोजन 105 गावांमध्ये शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत तानाजी सुरवसे यांनी घेतलेली असून तानाजी सुरवसे यांना निश्चित या कामाचं कौतुक शिवसेना नेते च्या उपस्थितीत केलं जाईल या शिबिराचा लाभ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी चे नियोजन करावे असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले या शिबराच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक पर भाषण शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन या गावचे सरपंच गणेश चव्हाण यांनी केले आभार प्रदर्शन करत असताना गणेश चव्हाण म्हणाले की आज पर्यंत आमच्या गावामध्ये नेहमीच शिवसेना धावून येते म्हणून आम्ही निश्चित पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत राहू असाही शब्द दिला यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने , शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे , उप तालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी ,संतोष सूर्यवंशी, सर्कल प्रमुख महादेव साळुंखे ,लोहटा गावचे सरपंच गणेश चव्हाण, सोसायटी सदस्य गोविंदराव कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य नागेश चव्हाण, दगडू पाटील, भरत फत्तेपुरे ,माजी पंचायत समिती सदस्य काळे ,प्रसाद वाडीकर ,शाखाप्रमुख अमोल चव्हाण ,अशा सेविका सुलक्षणाताई शिंदे ,विक्रम वाघमारे ,दादा बंडगर ,आप्पा चव्हाण, माणिक चव्हाण ,साधू चव्हाण ,शिवसैनिक व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.