मुंबईः मुलींचा जीव घेऊन मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्या मुंबईत सध्या सत्तेचा सारिपाट मांडला जात आहे, त्याच मुंबईत एका तरुणीचा जीव घेऊन तिचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आलेला आहे राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. वरळी ‘सी फेस’ वर गोणीत तरुणीचा मृतदेह सापडला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येतंय.
सदरील तरुणीचं वय १८-२० वर्षांच्या दरम्यान होतं. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञाताविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुंबईत तरुणी-महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरळी कोळीवाडा येथील आयएनएस राहताचा पाठीमागे काल संध्याकाळी मृतदेहाची गोणी काही लोकांना आढळून आली. गोणीत तरुणीचे हायपाय तोडून भरलेले होते आणि त्याचा उग्र वास सुटला होता.सुरुवातीला घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणीची अद्याप ओळख पटली नसून तिचं वय अंदाजे 18 ते 20 या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.