पुणे, 2 जुलै : ठाकरेंच्या शिवसेना पक्षानंतर आता NCP पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगभागी झाले आहेत. दरम्यान, या बंडाचं भाकित 2 महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केलं होतं. ‘राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु, आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरू आहे, असा दावा काँग्रेस नेत्यांनी 2 महिन्यांपूर्वी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे 4 वरिष्ठ नेतेही गेल्याने शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या 29 आमदारांनी सह्या केल्या असून आणखी काही आमदार सोबत येणार असल्याची माहिती समोर येत आहे.शपथविधीपूर्वी AJIT PAWAR यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यानंतर अजित पवारांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शपथभवनात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, या बंडाचं भाकित दोन महिन्यांपूर्वीच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं.
शपथविधीपूर्वी AJIT PAWAR यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यानंतर अजित पवारांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शपथभवनात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, या बंडाचं भाकित दोन महिन्यांपूर्वीच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं.