काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण नाना पटोले यांच्यावर पक्षातील काही मोठ्या नेत्यांचा एक गट नाराज असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. एकाच पक्षातील दोन वरिष्ठ नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करताना दिसले. तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दिली जाऊ शकते असंही बोललं जात आहे.
LIVE: #NaakamiKe9Saal Press Conference by Shri P Chidambaram in Mumbai. https://t.co/hdNB4QZQda
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 29, 2023