• Thu. May 1st, 2025

पदवीधरला उघड पाठिंबा देणाऱ्या विखेंवर सत्यजित तांबे यांचा निशाणा, आघाडीच्या प्रचारात मामा-भाचे एकत्र

Byjantaadmin

Apr 25, 2023

अहमदनगर, 25 एप्रिल : बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगणार आहे. सातत्याने बिनविरोध होणाऱ्या विखे पाटील आणि थोरात यांच्या मतदार संघातील बाजार समितीत यावेळी निवडणूक होत असून विखे आणि थोरात गट आमने सामने उभे ठाकलेत. संगमनेर बाजार समितीवर थोरातांची तर राहाता बाजार समितीवर विखे पाटलांची एकहाती सत्ता राहिली आहे. यावेळी हे दोन्ही नेते एकमेकांना शह देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अपक्ष आमदार सत्यजीत तांबे सहभागी झाले असून त्यांनी नाव न घेता पदवीधर निवडणुकीत उघड मदत करणाऱ्या विखेंवर टीका केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि संगमनेर हे आजी व माजी महसूलमंत्र्यांचे मतदारसंघ आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. संगमनेरमध्ये विखेंच्या नेतृत्वात तर राहत्यात थोरात यांच्या नेतृत्वात एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाची प्रचार शुभारंभ सभा संपन्न झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे देखील मामांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे दिसून आलं. यावेळी मामा भाच्याने विखेंवर टीका करत हे दहशतीचे वातावरण आपल्या तालुक्यात येऊ द्यायच नाही असे आवाहन केले आहे.

सत्यजित तांबेंना विखेंवर निशाणा

बाळासाहेब थोरात यांना ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते पुढच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर दिसले हा इतिहास आहे. पलीकडून एक विमान निघालेलं आहे. त्याला ना पायलट ना त्यांच्यात इंधन अशी अवस्था. ते विमान कुठं तरी धडकल्याशिवाय राहणार नाही, फक्त ते आपल्या तालुक्यात धडकून आपलं नुकसान होणार नाही, यासाठी आहे तसे विमान परत पाठवण्याच काम आपल्याला करायचं आहे अशी टीका अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी विखेंच नाव घेता केली आहे. विशेष म्हणजे नाशिक पदवीधर निवडणुकीत विखे यांनी उघडपणे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर प्रथमच सत्यजीत तांबे यांनी टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाषणातून टीका करताना विखेना अनेक टोले लगावले आहेत. मी महसूलमंत्री होतो अनेक काम केली. मात्र, आता जे महसूलमंत्री झाले त्यांनी पहिली मिरवणूक संगमनेरला काढली आणि घोषणा दिली “हम से जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा”, तेव्हापासून केवळ जिरवाजिरवीचे काम सुरू केले आहे. आम्ही असं काय केलं की हा त्रास दिला जातोय असा सवाल थोरात यांनी केला. तसेच डॉ. सुधीर तांबे यांना सुद्धा अनेकदा खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *