• Wed. Apr 30th, 2025

राज्यात नवी संस्कृती…”, अजित पवारांचं फडणवीसांना आवाहन, म्हणाले…

Byjantaadmin

Mar 24, 2023

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले. तसेच राज्यातलं सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. यासाठी तपास यंत्रणांना विरोधी पक्षातील लोकांच्या मागे लावलं जात आहे, असं पवार म्हणले.

अजित पवार म्हणाले की, “दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे विरोधकांना तुरुंगात टाकण्याची प्रथा आपल्या राज्यात नव्हती. पण आपल्या काळात (भाजपा) ही प्रथा सुरू झाली. छगन भुजबळ असतील, अनिल देशमुख असतील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक या नेत्यांना सरकारने तुरुंगात टाकलं. अनेकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. परंतु या काळात भुजबळ, देशमुख, राऊत, आव्हाड, मलिक किंवा मुश्रीफ कुटुंबीयांवर काय वेळ आली असेल. अशा काळात घरातली माणसं घरात राहात नाहीत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *