• Sun. Jun 15th, 2025

राहुल गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कार्य करावे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Jan 9, 2023

राहुल गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कार्य करावे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन

देशाच्या प्रगतीत काँग्रेसचा मोठा वाटा

संकटकाळात गरजूंना मदत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकार्याचे केले कौतुक-

 

लातूर :-लोकशाही मार्गाने सत्तेत आलेल्या देशातील सत्ताधारी मंडळींनी देश लोकशाही पद्धतीने चालविण्याऐवजी एकाधिकारशाहीच्या माध्यमातून चालविला जात आहे़ ज्यामुळे देशभर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ धर्माधर्मात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे़ माणुस माणसापासून दुर जात आहे़ मने कलुशीत होत आहेत़ ही परिस्थिती देशाच्या भवितव्यासाठी खुप घातक असल्याकारणानेच काँग्रेसचे नेते राहूल गांधी ‘भारत जोडा’ यात्रा काढून लोकांच्या मनातील भिती दुर करुन मने जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत़ त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निर्भय होऊन काम करावे, असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले़

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने ‘हात से हात जोडो’ हे अभियान संपुर्ण देशात राबविले जाणार आहे़ या अभियानाच्या पुर्व तयारीची बैठक लातूर शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि़ ६ जानेवारी रोजी शुक्रवारी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बोलत होते़

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड़ किरण जाधव, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळूंके, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सूर्यशीला मोरे, युवक काँग्रेसचे लातूर शहराध्यक्ष इम्रान सय्यद, प्रविण पाटील, प्रा़ प्रविण कांबळे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड़ प्रमोद जाधव, पृथ्वीराज सिरसाठ, सुभाष घोडके, रविंद्र काळे, सचिन दाताळ यांची उपस्थिती होती़

*विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस निवडणूक जिंकेल*

काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अभिमान वाटवा, अशा काँग्रेस पक्षाचे आपण सर्वजण सदस्य आहोत, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले़ महात्मा गांधी आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठी वंदनीय आहेत़ देशाला महाशक्तीपर्यंत घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षानेच केलेले आहे़ आज जे देशाच्या महाशक्तीबाबत बोलत आहेत ते काँग्रेस पक्षानेच केलेले काम सांगत आहेत़ देशाच्या प्रगतीचे सर्वश्रेय हे पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ़ मनमोहनसिंग यांना जाते़ देश उभारणीत काँग्रेसने मोठे योगदान दिलेले आहे़ देशात सर्वात चांगले संघटन हे काँग्रेस पक्षाचेच आहे़आजही देशात विकासाच्या मुद्यावर निवडणुका झाल्यातर काँग्रेस पक्ष २/३ बहुताने विजय होईल़ परंतू, विरोधी पक्षाचे लोक विकासाच्या प्रश्नावर निवडणुका लढण्यास घाबरतात म्हणुनच ते इतर विषयांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असतात़ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात़ देशातील लोकांमध्ये भय, भिती आणि असुरक्षीतता निर्माण याच लोकांनी केली आहे़ देशाच्या हिताला हे मारक असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्भय होऊन जनसामान्यांपर्यंत जाऊन काँग्रेसचा विकासाचा, सर्वधर्मसमभावाचा, एैक्याचा विचार सांगावा, असे आवाहनही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले़

यावेळी श्रीशैल उटगे, अ‍ॅड़ किरण जाधव, अभय साळूंके यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून डॉ़ गणेश कदम, शिरुर अनंतपाळ तालुका काँग्रेस सोशल मिडीया ज्ञानेश्वर पाटील, देवणी तालुका काँग्रेस सोशल मिडीया समन्वयक शंकर पाटील यांना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली़ तर वाढदिवसानिमित्त एनएसयुआयचे शरद देशमुख व युवक काँग्रेसचे इसरार सगरे यांचा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी डॉ़ अरविंद भातांब्रे, प्रा़ राजकुमार जाधव, सिकंदर पटेल, अ‍ॅड़ अजित बेळकुणे, मारुती पांडे, भाऊसाहेब कांबळे, कल्याण पाटील, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर, महेश धुळशेट्टे, विकास महाजन, जावेद तांबोळी, प्रविण सुर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, स्वाती जाधव, केशरबाई महापुरे, संध्या कांबळे, सोनू डगवाले, मतीन पटेल, अ‍ॅड़ देविदास बोरुळे, अविनाश बट्टेवार यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पक्षाच्या विविध फ्रंटल आॅर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत़े सूत्रसंचालन प्रा़ सचिन सूर्यवंशी यांनी केले़ तर प्रास्ताविक प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *