• Tue. Jun 17th, 2025

नणंद ग्रामस्थांच्यावतीने  प्रा.मिरगाळे यांचा सत्कार

Byjantaadmin

Oct 25, 2024

नणंद ग्रामस्थांच्यावतीने  प्रा.मिरगाळे यांचा सत्कार

निलंगा – खरीप जून 2024 मधील सोयाबीन अतिवृष्टीच्या नुकसाना बद्दल प्रशासनास निवेदन देऊन व पंचनामे करून शासनाकडून ननंद येथील 1350 शेतकऱ्याना हेक्टरी 6600 रु अतिवृष्टीचे अनुदान  युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने पेढे व साखर वाटप करून आनंद साजरा करण्यात आला व समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

            यावर्षी मृगाचा पाऊस पडल्यामुळे हजारो हेक्टरवर उडीद, मूग व सोयाबीन या पिकाची शेतकऱ्यांनी पेरणी केली पण दरवर्षीपेक्षा यावर्षी सतत अनेक दिवस पाऊस पडल्यामुळे शेतीमध्ये पाणी साचून उडीद, मूग व सोयाबीनचे जवळपास 80 टक्के नुकसान झाले असल्यामुळे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी  अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद व मूगाचे नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करावेत असे तहसीलदारांना निवेदन दिले. याची तात्काळ दखल घेत उपविभागीय अधिकारी झाडके साहेब यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले व ननंद गावचे तलाठी ननावरे व कृषी सहायक लासुने यांनी पंचनामे करून शासनास हा अहवाल सादर केला. शासनाने नणंद या गावातील 1350 शेतकऱ्यांना 800 हेक्टर बाधित क्षेत्रास प्रती हेक्टरी 6600 रुपये अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करून घेतल्याबद्दल नणंद येथील शेतकऱ्यांच्या वतीने युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांचा शाल, श्रीफळ व फेटा देऊन समस्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पेढे  वाटप करून आनंद साजरा करण्यात आला . यावेळी मधुकर लादे, हारुण बागवान, मनोज बालगीर, जिनेश्वर इंडे ,उद्धव जाधव, शिवाजी इंडे, तुकाराम यादव, संभाजी मिरगाळे, धनराज बोळे, शंकर स्वामी, संतोष टाकेकर, संतोष नांगरे, पिंटू पाटील, शिवाजी नांगरे, काशिनाथ तांबळे, कालिदास पाटील, दत्ता भोसले, रामलिंग मिरगाळे, बालाजी गिरी, सुलेमान पटेल, शंकर टोपन्ना, बालाजी नारायणपुरे, सागर कोरके, नागेश नरवणे, चेतन्य पेटकर, आनंद नारायणपुरे, महेश टाकेकर, रोहिदास बोळे, राम लादे, बसवराज पाटील, सतीश लादे, अभय मिरगाळे, जवाहरलाल पाटील, मयूर टाकेकर, ओम सूर्यवंशी, दत्ता मिरगाळे, रजाक बागवान, मैनोदिन बागवान, दस्तगीर बागवान, शिवाजी बोधले, शंकर डोके, राजकुमार तांबाळे, दयानंद स्वामी, समाधान स्वामी, बाहुबली लाळे, मनोज बेलकुंदे, ओम कुंभार, इत्यादी ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले. 800 हेक्टर बाधित क्षेत्रास जवळपास 55 लाख रुपये गावात आणल्याबद्दल नणंद ग्रामस्थांच्या वतीने प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *