महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्रीविलासराव देशमुख साहेब स्मृती सोहळयाची जय्यत तयारी
विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण
‘विलासभवन’ कारखाना प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास
लातूर प्रतिनिधी : पश्चीम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्यातही साखर कारखानदारी यशस्वी ठरते नव्हे तर ती राज्य आणि देशासाठीही आदर्श बनू शकते हे सिध्द करून या मागास विभागात आर्थिक क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झालेल्या विलास
साखर कारखान्यावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि विलास भवन या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीची शिलान्यास १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वाजता होत आहे.
लातूर जिल्हयात सहकार आणि साखर उदयोगाची उभारणी करणारे महान नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास
कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी क्षण असेल. हा कार्यक्रम आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि विलास भवन प्रशासकीय इमारत शिलान्यासाच्या निमित्ताने आयोजित समारंभ सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कारखाना संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात मात्र सहकार चळवळीला उशिरा चालना मिळाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १३ महिन्यांनी निजाम राजवटीतून मुक्ती मिळालेला मराठवाडा नंतर महाराष्ट्रात सहभागी झाला खरा परंतु इंग्रजी राजवटीपेक्षा मागास राहिलेल्या निजाम राजवटीत अनेक वर्ष पिचत पडलेल्या मराठवाड्यात प्रगतीचा विचार यायलाही बराच वेळ लागला. त्यामुळे या विभागात सहकाराची सुरुवातही उशिरानेच झाली. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर परिसर निजामाची राजधानी असलेल्या हैदराबादच्या जवळचा असल्यामुळे प्रारंभीपासूनच येथे थोडेफार शैक्षणिक वातावरण होते. शिक्षणातून प्रगल्भता आणि मग त्यातून स्वातंत्र्य आणि प्रगती होणे स्वाभाविक होते. परिणामी या भागात कर्तृत्ववान नेतृत्वाचीही निर्मिती झाली. त्यातून येथील उद्योग, व्यापार वाढत गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक यांनीही येथे सूतगिरणी उभारल्याची नोंद आहे. प्रत्येक टप्प्यावर नेतृत्व उभे राहिल्याने कधी काळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आणि मग पुढे सर्वांगाने या भागाचा विकास होत गेला. माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रालाही आदर्श घ्यायला लावणाऱ्या सहकारी संस्था लातूर जिल्ह्यात उभ्या राहिल्याचे चित्र आज आपणाला पाहायला मिळत आहे.
असे चित्र उभा करणारे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांचे विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी mता. जि. लातूर येथे उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळाचे अनावरण आणि ‘विलासभवन’ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास करण्यासाठी श्री.
विलासराव देशमुख साहेब स्मृति सोहळा रवीवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वा. आयोजित करण्यात आला आहे.
श्री विलासराव देशमुख साहेब स्मृती सोहळा कार्यक्रमाच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख निमंत्रक असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री, मा. श्री. दिलीपराव देशमुख आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मा.आ.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम
होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे
माजी महसुल मंत्री, विधानसभा, काँग्रेस पक्ष गटनेते मा. आ.श्री.बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मा.आ.श्री.जयंतराव पाटील, माजी केंद्रिय मंत्री, माजी मुख्यमंत्री, मा.
आ. श्री. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री, विधानसभा विरोधी पक्ष नेते, मा. आ. श्री. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधान परिषद मा.श्री.अंबादास दानवे, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, मा.आ.श्री.अमित विलासराव देशमुख उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती
सुप्रसिध्द सिनेअभिनेते मा.श्री.रितेश विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार, मा. आ. श्री. धीरज विलासराव देशमुख, कृष्णा सहकारी बॅक, चेअरमन, मा.डॉ.श्री.अतुलबाबा सुरेश भोसले राहणार आहेत
सन्मानीय उपस्थिती
माजी ऊर्जा मंत्री, मा. आ. श्री. नितीन राऊत, माजी शालेय शिक्षण मंत्री, मा. आ. श्रीमती वर्षा गायकवाड, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री, मा. आ. श्री. सुनील केदार, माजी महिला व बालविकास मंत्री, मा. आ. श्रीमती यशोमती ठाकूर, माजी आदिवासी विकास मंत्री, मा.आ. श्री. के. सी. पाडवी, माजी वस्त्रोद्योग मंत्री, मा.आ.श्री. असलम शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत हंडोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष, मा. श्री. मोहम्मद आरिफ नसीम खान, माजी गृह राज्यमंत्री, मा.आ.श्री.सतेज पाटील,माजी सहकार व सामाजिक न्याय राज्यमंत्री, मा. आ. श्री. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
कमिटी आमदार व कार्याध्यक्षा मा.आ.प्रणिती शिंदे,माजी परीवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री बस्वराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आमदार व
कार्याध्यक्षा कुणाल पाटील, मुंबादेवी विधानसभा आमदार मा.आ. श्री.अमिन आमिरअली पटेल, पाथरी विधानसभा आमदार मा.आ.श्री.सुरेश अंबादास वरपूडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, मा.श्री.शैलेश पाटील चाकूरकर राहणार आहेत.
विशेष उपस्थिती
मा.सौ.सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, टवेंटीवन अॅग्री लि. संचालिका मा.सौ.अदिती अमित देशमुख, जागृती शुगर लि. चेअरमन मा.सौ.गौरवी अतुल भोसले-देशमुख यांची विशेष उपस्थित राहणार आहे.
सन्मानीय पाहूणे
लातूर ग्रामिणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार मा. श्री. त्र्यंबक भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचीटणीस मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. श्री. किरण जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारुती महाराज स.सा.का, चेअरमन, मा. श्री. शाम भोसले, उच्चतम कृषी उत्पन बाजार समिती,
उपसभापती, मा. श्री. सुनिल पडिले, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक व्हा. चेअरमन मा. श्री. प्रमोद जाधव, जागृती सुगर्स अॅण्ड अलाईड इन्डस्ट्रिज उपाध्यक्ष, मा.श्री.लक्ष्मणराव मोरे, ट्वेन्टीवन शुगर्स लि.
उपाध्यक्ष, मा. श्री. विजय देशमुख, विलास को. ऑपरेटीव्ह बॅक ली. व्हा. चेअरमन समद पटेल, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा चेअरमन, मा.श्री. अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज स.साखर कारखाना व्हा चेअरमन मा. श्री. सचिन पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
श्री विलासराव देशमुख स्मृती सोहळा रवीवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी
