पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने कवी कुमार विश्वास यांनी केलेली राजकीय फटकेबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी कवितेतून मांडलेली उद्धव ठाकरेंची व्यथा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सांगून जाते. ‘जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता’ असे सांगत एकनाथ शिंदेंविषयी कुमार विश्वास यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आणि आता याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.
कविता सादर करण्यापूर्वी कुमार विश्वास यांनी कवितेचा विषय सांगितला. विनोद तावडे यांना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेविषयी समजावून सांगत आहेत. आता विषय स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचीच उत्कंठा वाढली. आणि ही उत्कंठा शमवण्याचे काम कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितेतून अगदी सहज केले. एकनाथ शिंदेंनी बंड करून शिवसेनेत फूट पाडली. आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. ही व्यथा उद्धव ठाकरे कवितेच्या माध्यमातून विनोद तावडेंना सांगत आहेत, असा कवितेचा आशय आहे…
‘बहोत तुटा बहोत बिखरा बखेडे सून नही पाया
हवाओं के इशारे पर मगर मैं बह नही पाया
अधुरा अनसुनाही रह गया यू प्यार का किस्सा
अधुरा अनसुनाही रह गया यू राज का किस्सा
कभी तुम सून नही पायें कभी मैं कह नही पाया
समंदर तीर का अंदर है लेकिन रो नही सकता
यह आसू प्यार का मोती हैं इसको खों नही सकता
मेरी चाहत को अपना तू बना ले ना मगर सुनले
जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता