• Wed. Jun 18th, 2025

माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांची थेट राहुल गांधींनी घेतली मुलाखत!

Byjantaadmin

Oct 25, 2023

(Pulwama Attack) शेतकरी आंदोलन  शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचा मृत्यू आदी मुद्यांवरून मोदी सरकावर सातत्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केलेल्या जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक  यांची आज काँगेस नेते राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे.

Rahul Gandhi has interviewed Satyapal Malik Ex governor of J&K and released the video on his YouTube channel Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik : पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांची थेट राहुल गांधींनी घेतली मुलाखत!

 

पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते

राहुल गांधी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, जेव्हा मला कळले की आमचे शहीद (शहीदांचे पार्थिव) विमानतळावर येत आहेत, तेव्हा मी थेट विमानतळावर गेलो. आमचे सुरक्षा रक्षक म्हणाले जाऊ नका, पण मी जातो म्हणालो. विमानतळावर गेल्यावर मला खोलीत कोंडून ठेवले गेले, मला सांगण्यात आले की तुम्ही खोली सोडू शकत नाही. दुसरीकडे शहीद जवानांच्या शवपेट्या आल्या होत्या, पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते. मी सुरक्षा रक्षकांना विचारले की हे कसं काय करु शकतात? मी लढलो आणि तिथून बाहेर पडलो. मला असे वाटले की तिथे एक शो तयार झाला आहे, असा खुलासा राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेत केला.

मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला

राहुल गांधी म्हणाले की, त्यादिवशी मला विमानतळावर मोठी घटना घडत असल्याचा भास झाला. जसे पंतप्रधान देशाला दाखवत आहेत. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, ‘ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी ते (पीएम) कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. मी 3-4 वेळा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाहीत. पाच सहा वाजता त्यांचा फोन आला, सत्यपाल भाई, काय झालं? मी म्हणालो की, आमच्यामुळे अनेक लोक वारले. ते म्हणाले की, नाही-नाही, गप्प बसा, आत्ता काही बोलू नका. एका तासानंतर मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला. तोपर्यंत मी हे दोन वाहिन्यांना सांगितले होते. ते म्हणाला नाही, नाही, यावर काही बोलू नका. पुलवामाच्या प्रश्नावर मलिक म्हणाले की, मी असे म्हणत नाही की त्यांनी हे केले आहे परंतु त्यांनी पुलवामाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. ही त्यांची त्यावेळची भाषणे आहेत जेव्हा ते म्हणतात की, तुम्ही मतदानाला जाल तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *