आगामी काळात ऊदगीर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून विलास सहकारी साखर कारखाना
युनीट – २ नावारूपाला येणार -आमदार अमित विलासरा देशमुख
गळीत हंगामाचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ,
आमदार धिरज देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
लातूर प्रतिनिधी , जळकोट, अहमदपूर तसेच जवळपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या उद्देश ठेऊन या कारखान्याची उभारणी झाली होती, तो
उद्देश आता सफल होताना आपण पहायला मिळत आहे, आगामी काळात या परिसराच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २
नावारूपाला येणार आहे असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख म्हणाले. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख व विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या प्रमुख
उपस्थितीत रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी तोंडार ता. उदगीर या ठिकाणी असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना युनिट २ चा सन २०२३-२४ च्या
गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला, या प्रसंगी माजी मंत्री, आमदार देशमुख म्हणाले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे
चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक ए.आर.पवार, मन्मथअप्पा किडे, मारुती पांडे, कल्याण पाटील, विजय निटूरे, सभापतीशिवाजीराव हूडे, उपसभापती प्रिती भोसले, कार्यकारी संचालक हनुमंत जाधव, रामराव बिराजदार, उषाताई कांबळे, संचालक सर्वश्री अनंत बारबोले, गोविंद बोराडे, भैरवनाथ सवाशे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजीत पाटील, गोवींद डूरे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, संजय
पाटील खंडापूरकर, निमंत्रीत संचालक सर्वश्री सिध्देश्वर पाटील, ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, संतोष तिडके आदीसह विलास सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी कर्मचारी खाते प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते. यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख महणाले, माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून लातूर जिल्ह्याचा समतोल सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा कारखाना मांजरा परिवारात घेऊन तो यशस्वीपणे चालवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा या कारखान्यानेही निर्माण केली आहे. कारखाना परिसरात असवानी प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे, लवकरच वीज निर्मिती व इतर प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण,सूक्ष्म सिंचनासह आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा आदी प्रकल्पही कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणार आहेत. या परिसरातील शेतकरी आणि कामगार, कर्मचारी यांनी या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून कारखान्याच्या वाटचालीत सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार अमित देशमुख यांनी केले. या प्रसंगी पूढे बोलतांना ते म्हणाले, यावर्षी अवर्षणामुळे साखर
कारखानदारीसाठी थोडी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्मचारी,कामगार जिद्दीने काम करतील त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही उत्तम सहकार्य लाभेल असा विश्वास ही यावेळी व्यक्त केला. ,साखर कारखाने ही शेतकऱ्यांची मंदिरे आपले साखर कारखाने ही शेतकऱ्यांची मंदिरे आहेत आणि या मंदिराच्या
माध्यमातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात गोडवा पसरविण्याचे काम होत आहे. भविष्यात साखर कारखाना परिसरात इथेनॉल पंप उभारून गावाकडच्या तरुणांना
गावातच काम मिळावे याची काळजी घ्यावी लागेल. शेतकरी, ऊसउत्पादकांचे अभ्यास दौरे काढावेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन शेती प्रयोगाची माहिती व्हावी याकरिता
कारखान्याने अभ्यास दौऱ्यावर पाठवावे, शेतकऱ्यांचा परदेश दौराही आयोजित करावा यासाठी मांजरा परिवाराने पुढाकार घ्यावा, शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्याला कोणी गालबोट लावनार नाही याची आपण सर्वांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. मराठवाड्यात व विदर्भात सर्वाधिक भाव देणारा व बोनस देणारा हा कारखाना ठरेल यात शंका नाही. गेल्या पन्नास वर्षापासून मांजरा परिवार या परिसरातील ऊस शेती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कणा राहिला आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांनी सुरू केलेला हा वारसा चिरंतन सुरू राहील यासाठी आपणाला काम करायचे आहे विकासाचे कालचक्र असेच सुरू राहिले पाहिजे. त्यासाठी समाजाशी असलेल्या आपल्या बांधीलकीला तडा जाणार नाही याचीही काळजी आपण घ्यायला हवी असेही यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले. यावेळी कार्यकारी संचालक ए.आर.पवार प्रस्ताविक करताना म्हणाले की, यहंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप उद्दिष्ट आहे त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळप करण्यासाठी द्यावा शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाला चांगला भाव कारखाना देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी यांना ऊस भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या वाहतूक ठेकेदारांचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते या वेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास संचालक प्रविण पाटील, लालासाहेब चव्हाण, बालाजी सांळूके, कुणाल बागबंदे, शिवाजी कांबळे, सचीन पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार संचालक गोविंद डूरे पाटील यांनी मानले.