• Thu. Jun 19th, 2025

मराठवाड्यात साखर कारखानदारित मांजरा साखर परिवाराचा अधिक दर-माजी मंत्री दिलीपराव देशमुख

Byjantaadmin

Oct 23, 2023
मराठवाड्यात साखर कारखानदारित मांजरा साखर परिवाराचा अधिक दर
जागृती शुगर कारखान्याचा 12 वा गाळप हंगामाचा डॉ अतुलबाबा भोसले सौ गौरवी भोसले यांच्या हस्ते शानदार शुभारंभ
लातूर दि. 22.मराठवाड्यात मागासलेपणा हा नाहीच व राहणारही नाहीं सहकार, अर्थव्यवस्था, शिक्षण, व शेती क्षेत्रात या भागाने गरुड झेप घेत लातूरच्या साखर उद्योगाने वेगळी ओळख निर्माण केली असून मराठवाड्यात मांजरा साखर परिवारातील कारखान्याने सर्वाधिक उसाला दर दिलेला आहे आगामी काळात जागृति शुगर उसाला चांगला भाव देणार असल्याचे जागृति शुगर चे संस्थापक  राज्याचे माजी मंत्री सहकार दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले ते देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर इंडस्ट्रीजच्या 12व्या बॉयलर अग्नी प्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ रविवारी कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ अतूल बाबा भोसले व जागृती शुगर च्या चेअरमन सौ गौरविताई अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यावेळी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी वैद्धकिय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जागृति शुगर च्या संचालिका सौ सुवर्णा ताई दिलीपराव देशमुख,आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख,जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर  उपस्थित होते
जागृती ने 75कोटी रूपये उस उत्पादकांना अधिक दीले ही सामाजिक बांधिलकी
पुढें बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की  कारखान्याचा बॉयलर नव्हे तर शेतकऱ्यांची चूल पेटन्यास मदत झाली आहे या माध्यमातून व्यापारी, हॉटेल, किराणा दुकानदार, यासह लाखो लोकांना आधार मिळत असून उस उत्पादक शेतकऱ्यांना 75कोटी रूपये जास्तीचे दिले आहेत ही आमची सामाजिक बांधिलकी असून चालु हंगामात शेतकऱ्यांनी उस गाळपासाठी द्यावा असे सांगून अधिक भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी यावेळी सांगितले.
मांजरा साखर परिवाराने विकासाचा रस्ता दाखवला*
भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून अमीत देशमुख यांच्याकडे जनतेचे लक्ष
कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ अतुलबाबा भोसले यांचे प्रतिपादन 
राज्यात नावलौकिक असलेल्या मांजरा साखर परिवाराचे लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्यात कष्ट त्याग करून साखर उद्योग उभे केले आणि विकासाला चालना मिळाली असून परिवारातील अँडव्हान्स टेक्नॉलॉजी मधील ट्वेंटी वन शुगर कारखाना उभा केला राज्यात नव्हे तर हा कारखाना देशात आदर्श राहील असे डॉ अतुलबाबा भोसले यांनी सांगुन आमदार अमित देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करत
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकत आमदार अमीत देशमुख यांचे कार्य सुरू असून राज्यांत वैधकीय शिक्षण मंत्री असताना अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम अमीत देशमुख यांनी केले असून भविष्यात राज्यांत नेतृत्व करण्याची युवक नेतृत्व म्हणून राज्यातील जनतेचे लक्ष असून आमदार अमित देशमुख यांच्या कडे राज्याचे नेतृत्व करावे अशी लोकभावना  असल्याचे डॉ अतुल बाबा भोसले यांनी बोलताना सांगितले.
जागृती शुगर म्हणजे ग्रामीण विकासाचा साक्षात्कार-माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जागृती शुगर च्या उत्कृष्ठ कार्याचा कौतुक करत या भागांतील लोकांना शेतकऱ्यांना स्वतः च्या पायावर उभा करण्याचे काम जागृति शुगर ने केले असून असा विकास होत असेल तर ग्रामीण भागातील लोकांना शहराकडे जाण्याची गरज वाटणार नाही या कारखान्यामुळे हा भाग तालुका सुजलाम सुफलाम झालेला दिसत आहे असे ते यावेळी म्हणाले.
उस उत्पादक शेतकऱ्यांना  अधिक दर देने शक्य अध्यक्षा सौ गौरवी भोसले यांचे मत 
यावेळी बोलताना कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी भोसले यांनी मागच्या 11गाळप हंगामात 52लाख 37हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 1237कोटी रूपये अदा केले आहेत असे सांगून सामाजिक बांधिलकी म्हणून एफ आर पी पेक्षा अधिक 76कोटी रूपये जास्तीचे उस उत्पादक शेतकऱ्यांना दीले आहेत गाळप क्षमतेत 4800 मेट्रिक टन करण्यात आली असून 22कोटी 25 लाख युनिट वीज महावितरण कंपनीला दिली आहे कारखान्याने सी एन जी, डिस्टलरी, यासह उपपदार्थाची निर्मिती नियमित सुरू असल्याने अधिक दर देणे शक्य झाल्याचे अध्यक्षा सौ गौरवी भोसले यांनी प्रास्ताविकात सांगीतले
जागृती शुगरने विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले-आमदार धीरज देशमुख यांचे मत
 शिस्तबध्द कारभार सुख, समृध्द समाधान, शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक विकास करण्यासाठी जागृती शुगर ने नवनवीन प्रकल्प राबवून शेतकर्याना जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका कारखान्याच्या अध्यक्षा गौरवी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली होत असून त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावर्षी वेळेवर उस घालावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी कार्यक्रमास माजी आमदार अँड त्रिंबक भिसे,राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, रेणा चे अध्यक्ष अध्यक्ष सर्जेराव मोरे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजूळगे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, जागृती शुगर चे संचालक दिलिप माने,संचालक सूर्यकांत करवा, सरव्यवस्थापक गणेश येवले, कोंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे यांच्यासह मांजरा साखर परिवारातील संस्थांचे पदाधिकारी, उस उत्पादक शेतकरी सभासद, पदाधिकारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमास लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,उदगीर बाजार समितीच्या उपसभापती प्रीती भोसले, इंदिरा सूतगिरणी चे अध्यक्ष बाळासाहेब कदम उपाध्यक्ष धनराज पाटील,जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे, बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे, शिलाताइ पाटील,अँड राजकुमार पाटील, दिलिप पाटील नागराळकर,अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाठ, सचिन पाटील, विलास साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बिडवे, गोविंद बोराडे  व्यंकटराव बिरादार , सुपर्ण जगताप, संभाजी रेड्डी, हरीराम कुलकर्णी, संभाजी सुळ, बालाजी साळुंखे, अँड बाबासाहेब गायकवाड,शिवाजी कांबळे, सतीश पाटील, बालाजी वाघमारे,कल्याण बर्गे, नितीन कारभारी अनिल पाटील, राम भंडारे, अनंत पाटील, रामचंद्र शिंदे, सचिन दाताळ, विजय कदम, जिल्हा बँक,रेणा साखर, मांजरा साखर कारखान्याचे संचालक ,मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक, विलास साखर कारखान्याचे संचालक, उस उत्पादक शेतकरी जागृती शुगर चे अधिकारी कर्मचारी कामगार मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *