शेतक-यांच्या उन्नतीसाठी अशोकराव पाटील निलंगेकर यांचे रेणूका देवीला साकडे
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा विधानसभा युवक काँग्रेस व अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने निलंगा ते खरोसा रेणूदेवीला पदयात्रेच्या निमित्ताने शेतक-याच्या उन्नतीसाठी ईडी- पिडा टळूदे बळीचे राज्य येऊदे, परतीचा पाऊस पडू दे, देविचा चमत्कार नवे विचार नवे सरकार येऊ दे. अशा विविध घोषनांने पायी जाऊन खरोसा येथील रेणूका देवीला साकडे घातले.
यावेळी पायी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व युवक काँग्रेस मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्य भाविक भक्तासमोर बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, सद्याची देशातील व महाराष्ट्रातील सरकार शेतक-याच्या हीताचे नसुन उद्यगपती, आदानी, आंबानी, यांच्या भल्यासाठी असुन गोर गरीब शेतकरी शेतमजुर यांना आता कोणी वाली नसुन ख-या आर्थांनी शेतक-यांच्या हिताचे सरकार आणण्याचे शरकार आणण्यासाठी देशातील राज्यातील भाजप सरकारला 2024 च्या निवडणूकीत सत्तेवरून खाली खेचले पाहीजे. अशे त्यांनी विचार व्यक्त केले. वाटेल आसलेल्या ईनानी व राधी राधे अन्नछत्राला भेटी देऊन पायी जाणा-या सर्व भक्तांना अन्नदान वाटप केले. या वेळी अशोकराव पाटील मित्र मंडलाचे जिल्हाध्यक्ष, प्रा. दयानंद चोपणे, निलंगा विधानसभा युवक काँ. ता. अध्यक्ष, अमोल सोनकांबळे, शहराध्यक्ष, अजित नाईकवाडे, प्रा. गजेंद्र तरंगे, ज्ञानेश्वर वाडीकर, सिराज देशमुख, सुरेंद्र धुमाळ, धुमाळ, शहनाज नाईकवाडे, अनिल अग्रवाल, दिनक दाजी बिराजदार, विठ्ठलराव पाटील, भारत बियानी, लाला पटेल, गंगाधर चव्हाण, प्रसाद झरकर, प्रमोद मरूरे, रोहन सुरवसे, सुधिर लखनगावे, महेश चिकराळे, उमेश पाटील, मैनोद्दीन मनियार, प्रमोद ढेरे, व्यंकटराव शिंदे, रोहन सुरवसे, पिन्टू चिकराळे, सिध्दू आवले, सतिष गोपाडे, प्रमोद अग्रवाल, राजू रेड्डी, आदेश जरी पटके, देविदास जाधव, धनाजी कोळेकर, पांडूरंग बोळे, संकेत मोहळकर, अदित्य धुमाळ, अजवत फारूकी, ओमकारव वाघमारे, इत्यादीसह शेकडो बाविक उपस्थित होते.