निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील औराद शहाजानी येथील मांजरा व तेरणा संगमावरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गेट टाकले नसल्याने हजारो क्युसेस पाणी कर्नाटकामध्ये वाहून गेले आहे . तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वतःच्या तालुक्यातील हजारो क्युसेस पाणी कर्नाटकामध्ये वाहून गेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता रॅली काढून नौटंकी केल्याच्या निषेधार्थ आज दि 21 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मांजरा व तेरणा नदी संगमावरील नदी पाञात ठिय्या अंदाेलन करुन महाराष्ट्र शासन व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जलसाक्षरता अभियानाची नाैटंकी करून दुर्लक्ष केले . व जलसंपदा विभागाने निष्काळजीपणा केला याचा निषेध करुन संबंधितावर कार्यवाही करुन येत्या दाेन दिवसात बंधारयाची दारे टाकावे अशी मागणी केली .
महाराष्ट्रात यंदा अल्प पाऊस पडला आहे . व परतिचा पाऊस पडलाच नाही यामुळे राज्य सरकार भर पावसाळ्यात टंचाईचे नियाेजन करत आहे . तर दुसरीकडे केवळ महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे निम्न तेरणा व मांजरा या दाेन नदयाच्या संंगमावरील वांजरखेडा काेल्हापुरी पाट बंधारयातुन अतिरिक्त पाणी साेडण्यात आले . विशेष म्हणजे दि 10 ऑक्टोबर रोजी गेट टाकले पाहिजे . मात्र जलसंपदा प्रशासनाने गेट टाकण्याची तसदी घेतली नाही . उलट प्रशासन डोळ्यावर पट्टी असल्याचे सोंग घेवून बंधारयाची दारे न टाकल्याने बंधारा काेरडाच राहीला तर कर्नाटक शासनाने महाराष्ट्राने साेडलेले अतिरिक्त हजाराे टिएम सी पाणी शेकडो किलाेमिटर पर्यंत पाईपलाईन करुन उपसा करत अनेक माेठया शहरांना व शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी माेठमाेठी तलाव भरुन स्टाेअरेज करत शाश्वत पाणी साठा व भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई चे नियाेजन केले आहे . मात्र महाराष्ट्रातील जलसंपदा विभाग मात्र स्टाेरेज नसल्याने व कर्नाटक शासनाच्या सुक्ष्म नियाेजना पुढे सफसेल फेल ठरत अतिरिक्त पाणी साेडुन देण्यात गुंतले आहे . यामुळे या भागातील शेकडो ऐकर शेतीचे सिंचन बुडाले शिवाय अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी यंञणा बंद पडण्याची शक्यता आहे . तर दुसरीकडे येथील आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतःच्या तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता रॅली काढून नौटंकी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी केला . यातील दोषीवर कारवाई करण्याची मागणी करत येत्या दोन दिवसात गेट टाकण्यात यावेत जेणे करून माकणी धरणातील पाणी सोडल्यानंतर पाणी साठा होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल . आणि पाणी टंचाईवर मात होईल असे अभय साळुंके म्हणाले .यावेळी काँग्रेसचे निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील , जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील , तालुका कार्याध्यक्ष अँड नारायण साेमवंशी , रमेश मदरसे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मदन बिरादार , औराद उपसरपंच महेश भंडारे , बालाजी भंडारे , भरत बियाणी , असिफ पेटल , शहाजान नाईकवाडे , विलास कांबळे आदीसह शेतकरी उपस्थित हाेते .
तालुक्यातील हजारो क्युसेस पाणी कर्नाटकामध्ये वाहून गेले :अभय साळुंके यांचे ठिय्या आंदोलन
