• Thu. Jun 19th, 2025

तेलंगणाच्या निवडणुकीला लागला हळदीचा रंग; राहूल गांधींनी केली मोठी घोषणा

Byjantaadmin

Oct 21, 2023

तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास हळदीच्या उत्पादनावर शेतकऱ्याला प्रती क्विंटलमागे १२ ते १५ हजार किमान आधारभूत किंमत देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी जगत्याल येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत दिले.

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी तेलंगणात विजयभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. जगत्याल येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेदरम्यान बीआरएस, एमआयएमवर टीका राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि ‘एमआयएम’वरदेखील जोरदार टीका केली. हे तीनही पक्ष एकमेकांना मदत करत असून, राव यांचा पक्ष लोकसभेत भाजपला पाठिंबा देतो, असा आरोप गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेसची सत्ता आल्याल आम्ही येथील शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामागे किमान आधारभूत किमतीपेक्षा ५०० अधिक देऊ” यावेळी राहुल यांनी सत्तेत आल्यास जातिनिहाय जनगणना घेण्याचे पुन्हा आश्वासन दिले.

त्याचप्रमाणे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात करण्यात आलेला जातिनिहाय तपशील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जनतेसमोर येऊ दिला नाही असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला.केंद्रात सत्तेत आल्यास हा तपशील देखील सार्वजनिक करण्यात येईल असे राहुल म्हणाले.राहुल गांधी यांनी ROAD SHOW  दरम्यान, रस्त्याशेजारील खाण्याच्या एका टपरीवर डोसाही बनवून पाहिला त्याचप्रमाणे रोड शो मध्ये त्यांना भेटणाऱ्या लहान मुलांना चॉकलेटही दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *