निलंगा मतदार संघाला विकास निधी कमी पडू देणार नाही पाण्याचा वापर जपून करावा, शेतकऱ्यांना पीकविमा मिळणारच
निलंगा /प्रतिनीधी
निलंगा मतदार संघाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणून बुजून निधी दिला नाही परंतु सध्याचे महायुती सरकार असल्यामुळे निलंगा मतदान संघाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देऊन शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम मिळणारच असे आश्वासन माजी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले.निलंगा तालुक्यातील दापका,शिंधीजवळगा,तुपडी,मुगाव शेंद,डांगेवाडी,कलांडी, बसपूर,शेडोळ, वाडी शेडोळ, गौर,माचरटवाडी,उमरगा (हा), आदी गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या निमित्त ते बोलत होते.
या वेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,तहसीलदार उषाकिरण शृंगारे,महावितरणचे शिवशंकर सावळे,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री बोरफळे तालुका अध्यक्ष कुमोद लोभे,दगडू सोळुंके, शेषेराव ममाळे,गुंडेराव जाधव यांच्या सह आदीजन उपस्थित होते.यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.गणेश उत्सवाच्या काळात जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याला शेती साठी व उद्दोगासाठी पाणी कसे मिळेल यासाठी शासन दरबारी मागणी केली आहे.सरकार आपले असले तरी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा असे आव्हाहन करून निलंगा मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देऊन सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.
बाकली – बसपूर पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 75 लक्ष ….आमदार निलंगेकरांनी केले उद्घाटन
दोन तालुक्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्वाच्या रस्त्यावर बाकली-बसपुर मांजरा नदीवर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी ७५लाखांचा निधी मंजुर करून त्या कामाचे भूमिपूजन दि.१५ रोजी सायंकाळी माजी पालकमंत्री,आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.पुलाचा भाग खचल्याने पुलाची अतिशय दैनिक दुरावस्था झाल्यामुळे तसेच दोन तालुक्याला जोडणारा हा रस्ता असल्याने नागरिकांची खूप मोठी वर्दळ होती त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. हीच जनभावना मागणी ओळखून संबंधित विभागाला आदेशित करून तात्काळ ७५ लक्ष रुपये कामासाठी मंजूर केले. दि १५ रोजी प्रत्यक्ष स्वतः येऊन कामाचे भुमिपुजन केले. यावेळी रामभाऊ काळगे, दत्तू अजने, सुधाकर बिरादार, देविदास पाटील, वामनराव चव्हाण, सखाराम काळे, जोतिराम कुमठे, तानाजी कांबळे, रमेश बिरादार, किशन नरवटे, विलास पाटील आदीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे तैलचित्र देऊन सत्कार केला.