• Sun. Jun 22nd, 2025

समृद्धी महामार्ग शापित अन् त्यावरील बळी म्हणजे…

Byjantaadmin

Oct 15, 2023

समृद्धी शनिवारी रात्री झालेल्या अपघातावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. समृद्धी महामार्ग शापित आहे. हा महामार्ग घाईघाईने बनवून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याचे परिणाम निरपराध जनता भोगतेय, असे संजय राऊत म्हणाले तर सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीही संजय राऊत यांनी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकाच्या हत्या होताहेत. या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का करू नये? टोलचे राजकारण करण्यासाठी मंत्री धावताहेत, मग इथे कोण जाणार? यांचे प्राण कोण वाचवणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *