• Sat. May 10th, 2025

हे दोषी माफीसाठी पात्र कसे ठरले:बिल्किस बानो केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा सवाल, निर्णय राखून ठेवला

Byjantaadmin

Oct 12, 2023

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेला दिलेल्या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. यादरम्यान हे दोषी माफीसाठी कसे पात्र ठरले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. गेल्या वर्षी गुजरात सरकारने त्यांची सुटका केली होती. 2002 च्या गुजरात दंगलीत त्यांच्यावर 14 खून आणि 3 सामूहिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने बिल्किस बानोंचे वकील आणि केंद्र, गुजरात सरकार आणि जनहित याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर दोषींना दिलेल्या मुक्ततेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला.

 

सर्वोच्च न्यायालयाने कोणता प्रश्न उपस्थित केला?

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विचारले की त्यांची सुटका कशी झाली? न्यायालयाने सांगितले की, आम्ही शिक्षा माफीच्या विरोधात नाही, कारण ते कायद्यात मान्य आहे, पण हे दोषी माफीस कसे पात्र ठरले हे स्पष्ट केले पाहिजे?

सुटकेला आव्हान देणाऱ्या बिल्किस बानो यांनी दाखल केलेल्या याचिकेव्यतिरिक्त, सीपीआय(एम) नेत्या सुभाषिनी अली, स्वतंत्र पत्रकार रेवती लॉल आणि लखनौ विद्यापीठाच्या माजी कुलगुरू रूप रेखा वर्मा यांच्यासह अनेकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनीही शिक्षा माफी आणि दोषींची मुदतपूर्व सुटका याविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.

गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर उसळलेल्या जातीय दंगलीतून पळून जात असताना, वयाच्या 21व्या वर्षी, पाच महिन्यांची गरोदर असताना, बिल्किस बानोवर बलात्कार झाला. त्यांची तीन वर्षांची मुलगी दंगलीत मारल्या गेलेल्या कुटुंबातील सात सदस्यांपैकी एक होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *