मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकररावचव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणिरुग्णालयात वर्षभरात उपचारादरम्यानसाडेतीन हजारावर रुग्णांचा मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली यासह तेलगंणातील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. जवळपास ५०० खाटांचे हे रुग्णालयआहे. मात्र सद्य:स्थितीत १२०० रुग्ण उपचारघेत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूननांदेडमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आलेआहे. मात्र येथे सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाणही सर्वाधिकदिसून येते. दररोज शेकडोच्या संख्येने रुग्णभरती होतात. दरम्यान, सप्टेंबर (२०२३)महिन्यात ६ हजार ८९४ रुग्ण (ॲडमिट)दाखल झाले होते. तर, ३० सप्टेंबर या एकादिवशी ११७८ रुग्ण ओपीडीत आले होते. याठिकाणी डेंग्यू, मलेरिया यासोबतच विषबाधा,सर्पदंश, अपघात, हृदयविकार, मनोरुग्ण,महिलांचे विविध आजार, प्रसूती आदी सर्वप्रकारचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. याठिकाणी सीटी स्कॅन मशीन एक्स-रे मशीनयासह इतर आवश्यक असलेले तपासणीमशीन बंद आहेत. तसेच औषधांचा तुटवडा,वाॅर्डमधील डॉक्टर लक्ष देत नाही, असाआरोप नातेवाइकांमधून केला जातो. प्रत्येकगोष्ट नातेवाइकांना बाहेरून आणावी लागते.वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णदगावतात. दररोज १४ ते १६ रुग्णांचा मृत्यूहोतो. या वर्षभरात साडेतीन हजारांवर रुग्णांचामृत्यू झाल्याचे रुग्णालयातील आरोग्यप्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
चौकशी करण्यासाठी आलेली तज्ज्ञांची समिती, आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे दौरे यामुळे रुग्णालय प्रशासनाची लगबग तर सलग दुसऱ्या दिवशीही सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची वाढलेली चिंता असे चित्रमंगळवारी नांदेडच्या डॉ. शंकररावचव्हाण वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयात होते, तर रुग्णालयातदिवसभर मोठ्या प्रमाणात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला होता.छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीयतज्ज्ञांची समिती येणार असल्यानेरुग्णालय प्रशासनाकडून प्रत्येक वाॅर्डातपुरेसे डॉक्टर आणि नर्स उपलब्ध करूनदेण्यासाठी लगबग सुरू होती.
रुग्ण वाचवण्याचा प्रयत्न
या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणअधिक आहे. यात रेफर झालेले रुग्णसर्वाधिक असतात. दाखल होतानाचते अत्यवस्थ असतात. आमचारुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न असतो.वेळप्रसंगी बाहेरून औषधे उपलब्धकरून दिल्या जातात. परंतु,उपचारास रुग्णांचा प्रतिसाद मिळतनाही. ते मृत पावतात. वर्षभरातजवळपास साडेतीन हजारांवररुग्णांचा मृत्यू झाला आहे. – डॉ. गणेश मनूरकर, वैद्यकीय अधीक्षक.
छायाचित्रणास मनाई
रुग्णालयाच्या परिसरात आणि वॉर्डातछायाचित्रण करण्यास मनाई करण्यातयेत होती. इथे नियुक्त खासगी सुरक्षारक्षक पत्रकारांना थांबवत होते. वरिष्ठअधिकाऱ्यांची परवानगी घ्या आणिनंतरच फोटो घ्या, असे ते सांगत होते.तर वाॅर्डात पाणी उपलब्ध करून द्याम्हणून अनेक नातेवाईक डॉक्टर आणिसुरक्षा रक्षकांनाही विनंती करत होते.
ही आहेत मृत्यूची कारणे
उपचारास विलंब :आधीच अत्यवस्थ रुग्ण येथेयेतात त्यात अनेकदा त्यांना बेडमिळत नाही. प्रकृती बिघडते.
औषधांचा तुटवडा : बाहेरुन औषधी आणण्यास सांगते.अनेकांची खर्च करण्याची क्षमता नसते. परिणामी मृत्यू वाढतात.
मनुष्यबळाचा अभाव : डॉक्टर, नर्स व स्वच्छता कर्मचारीयांची संख्या अपुरी आहे. त्याचापरिणाम आरोग्य सुविधांवर होतो.
बंद असलेली उपकरणे :सीटी स्कॅन, एक्स रे ही यंत्रे अनेकदिवसांपासून बंद आहेत. नवजातशिशू कक्षातील काही वार्मरही बंद.
७० परिचारिकांची बदली;दुसऱ्या बदलून येईनात
विष्णुपुरीतील रुग्णालयात परिचारिकांच्या १५० तर स्वच्छताकर्मचाऱ्यांची ७० पदे रिक्त आहेत.त्यामुळे रुग्णांना सेवासुविधा मिळण्यातअडथळा निर्माण होतो. डॉ.शंकररावचव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणिरुग्णालयात एकूण २० विभाग आहेत.यात नुकतेच प्राध्यापक, सहायकप्राध्यापक यांचे ५४ पदांची भरतीकरण्यात आली आहे. या ठिकाणी १०४निवासी डॉक्टर तर २७४ परिचारिकाआहेत. दरम्यान, ७० परिचारिकांचीनुकतीच बदली करण्यात आली.त्यांच्या जागेवर दुसऱ्या परिचारिका रुजूहोणे बाकी आहे.
नातेवाइकांचा वाढला रोष
वाॅर्ड क्रमांक ३४ च्या समोर असलेल्यापॅसेजमध्ये सकाळी १०.३० वाजेच्यासुमारास काही कर्मचारी स्वच्छता करतहोते. गेली ८ दिवस यांना अनेक वेळासांगूनही यांनी स्वच्छता केली नाही, आजमात्र मंत्री येणार असल्यामुळे हे स्वच्छताकरत आहेत, यांना रुग्णांची काळजी आहेका? अशा शब्दात एक वृद्ध महिलाआपला संताप व्यक्त करत होती.