• Thu. May 1st, 2025

मनोज जरांगे उपोषणावर ठाम; सरकारच्या त्या भूमिकेचं स्वागत केलं, पण…

Byjantaadmin

Sep 7, 2023

जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासूंन उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारची भूमिका मान्य असली तरी उपोषण सुरच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे अंतरवाली सराटी गावात उपोषणावर बसलेले मनोज जरांगे तब्बल १० दिवसांपासून उपोषणावर बसले आहे. त्यांनी काहीही खाल्ले नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आहे. असे असतांना देखील त्यांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना जरांगे म्हणाले, सरकारने मराठा अरक्षणासंदर्भात आदेश काढले असले तरी ते आमच्यापर्यंत अद्याप पोहचलेले नाहीत. प्रसार मध्यमांकडून आम्हाला काही माहिती मिळाली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. मात्र, आमच्या कुणाकडेच कुणबी असल्याची नोंद नाही. त्यामुळे यात सरकारने सुधारणा करावी. तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनाच्या अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना पोलिस अटक करायला आले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली होती. या आंदोलनाचा परिमाण राज्यभर झाला. दरम्यान, यामुळे सरकार अलर्ट झाले असून आरक्षणासाठी त्यांनी हालचाल सुरू केली आहे.जरांगे म्हणाले, आम्ही शांतपणे आंदोलन करत आहे. आमचे सहकारी आजही रुग्णालयात उपचार घेत आहे. तरीही आम्ही शांत अहोत. सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढले असले तरी या आदेशाची प्रत आम्हाला मिळालेली नाही. ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे कळले. मात्र, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. या साठी सरकारने १ महिन्याचा वेळ मागितला आहे.आमच्या कुणाकडे कुणबी असल्याची नोंदी नाही. यामुळे हा निर्णय सुधारावा आणि सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत. ते घेऊन जावेत. जरांगे यांनी निजामकालीन पुरावे वाचून दाखव मराठा जाती समूहाची कुणबी म्हणून नोंद असल्याचा दावा देखील केला आहे. सरकरच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी यावे आणि चर्चा करावी. आमचे हे दोलन असेच सुरू असणार आहे असे देखील जरांगे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *