श्री राघवेंद्र स्वामी आराधना सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न
श्री उत्तरादी मठ व मध्व मंडळाचा पुढाकार भक्ती संगीत सेवा प्रवचन, भजन, महाभिषेक,हवन संपन्न
लातूर -लातूर येथील श्री उत्तरादिमठ व श्री मध्व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून आयोजीत करण्यात आलेल्या श्री राघवेंद्र स्वामी आराधना तिन दिवसीय सोहळ्याचा शनीवारी सायंकाळीं समारोप करण्यात आला समारोपास प्रमुख अतिथी म्हणून मध्वशास्त्र संपन्न अनंतचआचार्य काशीकर, संगीत रत्न पंडित शिवदास देगलूरकर, लातूर येथील श्री उत्तरा दिमठाचे प्रमुख पंडित रघुत्तमाचार्य जोशी, श्री मध्व मंडळाचे अध्यक्ष अँड श्रीराम देशपांडे सचिव संजय राजहंस उपस्थित होते या तिन्ही दिवसात राघवेंद्र स्वामी आराधना सोहळ्यात भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला पुजा, अभिषेक, भक्ती संगित, प्रवचन, भजन अस्टोत्तर,सेवेने भाविक भक्तीमय वातावरण तयार झालेले दिसत होते
यावेळी पंडित अनंतचार्य काशीकर यांनी महाभारतातील वेद या विषयवार मार्गदर्शन केले तसेच श्री राघवेंद्र स्वामी यांच्या जीवनावर आधारीत त्यांच्या कार्याची माहिती दिली *श्री मध्व मंडळाचे अध्यक्ष अँड श्रीराम देशपांडे यांनी गेल्या 25 वर्षात सुरू असलेल्या मध्व मंडळाच्या आराधना उत्सव, सामाजिक उपक्रम धार्मिक कार्यक्रम समाजप्रती असलेल्या सर्व कार्य पुढे चालूच राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून आगामी काळात होणाऱ्या उत्सवात अधिक कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले*
निस्वार्थ भावनेने भगवंताची सेवा करा
पंडित रघृत्तमआचार्य जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की आपण निस्वार्थी भावनेने भगवंताची सेवा केल्यास त्याचे फळ आपल्याला देत असतो त्यासाठी आपण नित्य नियमाने पुजा, संध्या, स्तोत्र, गायत्री मंत्राचा उच्चार करावा असे सांगून राघवेंद्रतीर्थस्वामी उत्तरादी मठाचे जगदगुरु श्री श्री 1008श्री सत्या त्मतिर्थस्वामीजी यांच्या आशीर्वादाचे अनुभव कथन केले यावेळी श्री मध्व मंडळाचे अध्यक्ष अँड श्रीराम देशपांडे सचिव संजय राजहंस, उपाध्यक्ष किशोर कुलकर्णी, कोषाध्यक्ष मनोज देशपांडे, कार्यकारणी सदस्य प्रवीण देशपांडे भानुदास भातांब्रेकर, हरीराम कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे प्रविण सौदती बाळासाहेब देशपांडे वसंत बेंडे, सौ संयुक्ता राजहंस सौ अमिता देशपांडे सौ नभा जोशी सौ मनीषा भातांब्रेकर, सौ पुजा जोशी उपस्थित होते
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा केला प्रशस्ती पत्र देवुन सन्मान
संगीत रत्न पंडित शिवदास देगलूरकर, हरीश खंडेराव कुलकर्णी, किरण भावठानकर, प्रा. देवेंद्र कुलकर्णी, तसेच विवाहास 50 वर्ष पूर्ण केलेल्या जोडप्याचा प्रशस्ती पत्र शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमांचे प्रास्ताविक सचिव संजय राजहंस यांनी करून त्यांनीं मध्व मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला आभार प्रदर्शन बाळासाहेब देशपांडे यांनी मांडले यावेळी रत्नाकर धोंडदेव, अमोल मुळे जेष्ठ पत्रकार रामेश्वरजी बद्दर, डॉ मधुकरराव कुलकर्णी, डॉ माया कुलकर्णी, सौ प्रतिभा देशपांडे, सौ शरयू धोंडदेव , सौ कालिंदी पत्की, नारायण धर्माधिकारी, विजय अळगीकर, अनंत आघोर,महेश निटुरकर, सचिन दिवाण,नंदकुमार कुलकर्णी, शिवणे, अंबादास पत्की, बाळासाहेब गौरकर, नारायण देशपांडे धनंजय बोरगांवकर सुरेश कवठालकर, संजय नीलेगावकर, शामराव हत्तर्गेकर, सुधाकर पाटील, अँड सतीश दिवाण रामकृष्णचार्य हलगरकर पंडित श्रीपाद हलगरकर वेणूमाधव जोशी सुहास गडीकर, निलेश पत्की,अनिल शास्त्री जयंत औरादकर ,खंडेराव जेवलीकर, अमीत पांडे, वांगजीकर , बेलकुंडकर,आपसिंगेकर,जोशी विविध क्षेत्रांतील मान्यवर समाजातील भक्त गण भाविक, महिला पुरुष, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते