चीनच्या भारतातील वाढत्या घुसखोरीच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात. त्यांना हा भ्रम असण्यात काहीच अडचण नाही. पण त्यांनी चीनच्या मुद्यावर आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे ते म्हणालेत.
आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एका फेसबूक पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मोदी स्वतःला विश्वगुरू म्हणतात. त्यांना हा भ्रम असण्यात मला काहीच अडचण नाही पण, ते खरंच विश्वगुरू असतील तर त्यांनी आणि भाजप-आरएसएसच्या त्यांच्या गुंडांनी ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, चीनने नकाशा प्रकाशित करून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला स्वतःचा भाग दाखवले आहे. विश्वगुरूच्या राज्यात भारताची भूमी चीनमध्ये का दाखवली जातेय? अरुणाचल प्रदेशातील जागांचे नाव चीन का बदलतेय?भारताने विरोध करूनही BRICS चा विस्तार करण्यात आला हे खरे आहे की नाही? तुमचा विश्वगुरूचा शिक्का बिनकामाचा आणि नावापुरताच आहे का? या विस्तारामुळे भारतापेक्षा चीनची ताकद वाढली नाही का? प्रत्येक घुसखोरीत चीन आपली जमीन बळकावते. BRICS च्या भेटीमध्ये चीनच्या केली का?वाढत्या घुसखोरीबद्दल चर्चा तिबेटला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता का देत नाही?, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.ते पुढे बोलताना म्हणाले की, चीनवर तुमची भूमिका इतकी नरम का? त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक का करत नाही? तुमचा जोश आता हाय नाही का? की 2014 च्या निवडणुकीत भाजप-आरएसएसने चिनी कंपन्यांकडून घेतलेला राजकीय निधी वापरला म्हणून? कृपया उत्तर द्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
चीनने अरुणाचल प्रदेशाला आपल्या हद्दीत दाखवले
चीनने सोमवारी आपल्या देशाचा यंदाचा अधिकृत नकाशा जारी केला. या नकाशात चीनने अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन प्रदेश, तसेच तैवान व वादग्रस्त दक्षिण चिनी समुद्र आपल्या नकाशात दाखवलेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.