• Fri. Jun 20th, 2025

‘एक महिला आपल्या मुलाच्या मृतदेहासोबत..”; राहुल गांधींनी सांगितली मणिपूरची ह्रदयद्रावक घटना!

Byjantaadmin

Aug 9, 2023

मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन आतापर्यंत वादळी ठरत आहे.केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष होते. यावेळी सभागृहात बोलतानागांधींनी मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला आहे. तसेच, गांधी यांनी आपल्या मणिपूर भेटीतील काही घटनांचा उल्लेख करत, सरकारला टोकदार प्रश्न विचारले आहेत.राहुल गांधी लोकसभेत भाषणात म्हणाले, राहुल गांधी, “मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण प्रधानमंत्री अजूनही गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नाही. मी मणिपूरबद्दल बोलतोत. मणिपूर आज वाचलं नाहीये. त्याला तुम्ही तोडलं आहे. त्याचे दोन तुकडे केले आहेत. मी मणिपूरच्या रिलिफ कँपमध्ये गेलो होतो. तेथील महिलांशी बोललो, तिकडच्या मुलांशी संवाद साधला.”

गांधी पुढे म्हणाले, “मणिपूरमध्ये मी एका महिलेशी बोललो. ताई, काय घडलं तुमच्यासोबत? त्या म्हणाल्या की, माझ्यासमोर माझ्या मुलाला बंदुकीतून गोळी मारण्यात आली. मी पूर्ण रात्र मुलाच्या पार्थिवासोबत होते. मला भीती वाटली, मी माझं घर सोडलं. आता माझे कपडेच माझ्याजवळ राहिलं आहे. एक फोटो दाखवून ती महिला म्हणते की, हेच राहिलं आहे माझ्याकडे. अजून एक महिलेला प्रश्न विचारल्यावर ती थरथर कापत होती. थरथर कापत ती बेशुद्ध झाली. मी फक्त दोन उदाहरण दिलं.”

हिंसाचारावरून राहुल गांधीचा तुफान हल्लाबोल :

MANIPUR मध्ये मोदी सरकारने भारताची हत्या केली. हिंदुस्तानची हत्या केली.BHARAT मातेची हत्या केली आहे. तुम्ही हिंसा थांबवत नाही, तोपर्यंत भारत मातेची हत्या होणे थांबणार नाही. अशा शब्दात RAHUL GANDHI नी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *