संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session of Parliament) आजच्या दिवसाची सुरवात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर ते आज पहिल्यांदा लोकसभेत बोलत होते.अध्यक्षांना ते म्हणाले, “लोकसभेत मला पुन्हा घेतलं म्हणून मी आपला आभारी आहे,” “आज मी अदानींवर बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, सत्ताधारी आज शांत राहू शकतात, आज मी फार टीका करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीला सत्ताधाऱ्यांनी गदारोळ केला. १३६ दिवसांनी त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात बोलत होते.
MODI SARKAR विरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, संसदेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला.केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लोकसभेत बोलताना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार ARVIND SAWANT यांना खाली बसण्यास सांगताना नारायण राणेंची जीभ घसरली.
मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली; राहुल गांधींचा तुफान हल्लाबोल!
मणिपूर प्रकरण, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन आतापर्यंत वादळी ठरत आहे.केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींनी यांनी मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला आहे.राहुल गांधी, “मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण प्रधानमंत्री अजूनही गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नाही. मी मणिपूरबद्दल बोलतोत. मणिपूर आज वाचलं नाहीये. त्याला तुम्ही तोजलं आहे. त्याचे दोन तुकडे केले आहेत. मी मणिपूरच्या रिलिफ कँपमध्ये गेलो होतो. तेथील महिलांशी बोललो तिकडच्या मुलांशी संवाद साधला.”गांधी पुढे म्हणाले, “मणिपूरमध्ये मी एका महिलेशी बोललो. बहन, काय घडलं तुमच्यासोबत? त्या म्हणाल्या की, माझ्यासमोर माझ्या मुलाला बंदुकीतून गोळी मारण्यात आली. मी पूर्ण रात्र मुलाच्या पार्थिवासोबत होते. मला भीती वाटली, मी माझं घर सोडलं. आता माझे कपडेच माझ्याजवळ राहिलं आहे. एक फोटो दाखवून ती महिला म्हणते की, हेच राहिलं आहे माझ्याकडे. अजून एक महिलेला प्रश्न विचारल्यावर ती थरथर कापत होती. थरथर कापत ती बेशुद्ध झाली. मी फक्त दोन उदाहरण दिलं.””मणिपूरमद्ये यांनी भारताची हत्या केली. हिंदुस्तान हत्या केली. भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही हिंसा थांबवत नाही, तोपर्यंत भारत मातेची हत्या होणे थांबणार नाही. मणिपूरमध्ये यांनी भारत मातेची हत्या केली आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे, अशा शब्दात जोरदार राहुल गांधींनी हल्लाबोल केला.