पुलवामा दुर्घटना प्रकरणात गंभीर आरोप करून भाजपला अडचणीत आणणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.त्यांच्या किमान पाच सभा आगामी काळात होतील, असे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
CONGRESS ओबीसी विभागाची मराठवाडास्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगर घेण्यात आली. भाजपने देशातील जनतेवर अन्याय केला आहे, जनतेची फसवणूक केली आहे, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी सत्यपाल मलिक यांच्या सभा घेतल्या जातीलSATYPAL MALIK भाजप हा ओबीसी समाजाचा शत्रू आहे. आमचे आरक्षण, आमची शिष्यवृत्ती भाजपला बंद करायची आहे.
आता रोहिणी आयोग आणला आहे, त्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे, या आयोगाच्या शिफारशी आम्ही देशात लागू होऊ देणार नाही, असा इशारा माळी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला.BJP यापूर्वीच्या महामंडळांना पैसा नाही, कार्यालय नाही, कर्मचारी नाहीत, असे असताना आता आणखी काही समाजासाठी महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे, ही एक प्रकराची फसवणूक असल्याची टीकाही माळी यांनी केली.संपूर्ण देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ३५ टक्के घटनात्मक आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात यावे, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून निधी उपलब्ध करून द्यावा, `महाज्योती` चे विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्याचे माळी म्हणाले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॉंग्रेसने आत्तापर्यंत का निर्णय घेतला नाही, अशी विचारणा केली असता, कॉंग्रेसची ती चूक झाली, असे त्यांनी सांगितले.