• Thu. Jun 19th, 2025

वृक्ष लागवड, संगोपन हे सरकारी कार्य नसून सर्व नागरिकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. – जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे

Byjantaadmin

Aug 8, 2023
वृक्ष लागवड, संगोपन हे सरकारी कार्य नसून सर्व नागरिकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. – जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे
शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोड, लातूर येथे आज १२०० झाडांच्या रोपणाचा कार्यक्रम लातूरच्या सन्माननीय जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे,उपजिल्हाधिकारी सौ.अहिल्या घाटाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. बकवाड, माजी नगरसेविका सौ. श्वेता लोंढे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सन्माननीय जिल्हाधिकारी सौ. घुगे मॅडम यांचा फुलांचे झाड, तुळशी बियांच्या राख्या, तुळस बियांचे पॅकेट, सीड बॉल देऊन सत्कार-सन्मान करण्यात आला.. तत्पूर्वी जिल्हाधिकारी मॅडम यांच्या समक्ष शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन च्या विद्यार्थिनी व ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी अवघ्या १० मिनिट मध्ये अर्जुन, कांचन, बेल, चिंच, आवळा, गुळवेल, रुद्राक्ष, कडीपत्ता, शेवगा अशा विविध प्रजातींची १००० झाडे लावून, त्यांना काठ्या लावून, टॅग बांधून, पाणी दिले. उत्कृष्ट टीमवर्क केले. जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर – घुगे मॅडम यांनी आपले दिलखुलास मनोगत व्यक्त करताना ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कार्याचे कौतूक केले, यापुढील काळात स्वतः जॉईन होऊन सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. झाडे लावणे हा उपक्रम सरकारी उपक्रम होऊच शकत नाही, झाडे लावणे, झाडे जगविणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकांचे कार्य आहे आणि पूर्ण जवाबदारीने प्रत्येकांनी झाडांचे संगोपन करावे असे आवाहन केले. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या अखंड १५३० व्या दिवसाचे साक्षीदार होत जिल्हाधिकारी सौ. घुगे मॅडम यांनी चाफ्याचे मोठे झाड लावले. तुळस बिया पॅकेट – ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने एक लाख तुळस बियांचे पॅकेट सर्वत्र वाटप करण्यात येत आहेत, तुळस बिया राख्या-राखी पौर्णिमा निमित्ताने तुळस बियांपासून बनविलेल्या राख्याचे आज जिल्हाधिकारी मॅडम यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले., यानिमित्ताने प्रत्येक घरी एक तुळशीचे झाड नक्कीच दिसेल.
यावेळी  शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन  मधील संस्थेचे प्राचार्य डॉक्टर के एम बकवाड यांचे सह कॉम्प्युटर विभाग प्रमुख राठोड, सौ. ऐतवडे  व कुलमंत्री अनघा गाढवे  यांची उपस्थिती होती. निवासी महिला तंत्रनिकेतन मधील एन एस एस च्या ५० विद्यार्थीनींची टीम व महाविद्यालयातील ४०० विद्यार्थिनीनी श्रमदान करून वृक्ष लावले.
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन च्या एकेका स्टाफला पाच पाच झाडांचे पालकत्व देण्यात आला आहे तसेच विद्यार्थिनींना पण एकेक झाडाचे पालकत्व देण्यात आले आहे डॉक्टर के एम बकवाड सर असे म्हणाले. संस्था स्तरावर एक हजार रोपांची लागवड श्रीमती रंजीता कोताळकर, जयराम राठोड त्यांच्या प्रयत्नातून साकार करण्यात आली.
पंकज स्वामी, ओंकार स्वामी, अशोक सर, मोहाळे सर यांनी वृक्ष लागवडीसाठी परिश्रम घेतले. ग्रीन लातूर वृक्ष टीमने या उपक्रमाचे नियोजन करून वृक्ष संगोपनाची जवाबदारी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *